पीटीआय, ढोलेरा

टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या ढोलेरा येथील प्रकल्पातून पुढील काही वर्षांत टप्प्याटप्प्याने ७२ हजार रोजगार निर्मिती होईल, अशी माहिती टाटा सन्सचे अध्यक्ष एन.चंद्रशेखरन यांनी बुधवारी दिली.

टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या गुजरातमधील ढोलेरा आणि आसाममधील सेमीकंडक्टर प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर चंद्रशेखरन बोलत होते. ते म्हणाले की, ढोलेरा आणि आसाममधील प्रकल्पांचा पुढील टप्प्यांत विस्तार केला जाणार आहे. या प्रकल्पांतून विविध क्षेत्रांची चिपची गरज पूर्ण होणार असून, त्यात वाहन, उर्जा, इलेक्ट्रॉनिक्स आणि वैद्यकीयसह इतर क्षेत्रांचा समावेश आहे. आता फक्त सुरूवात झाली आहे. ढोलेरा येथील प्रकल्पातून ५० हजार आणि आसाममधील प्रकल्पातून २० ते २२ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. मात्र, त्यासाठी काही कालावधी लागेल.

हेही वाचा >>>औद्योगिक उत्पादन दर जानेवारीमध्ये ३.८ टक्क्यांवर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चिप निर्मिती प्रकल्पातून प्रत्यक्ष उत्पादन सुरू होण्यास सुमारे ४ वर्षांचा कालावधी लागतो. ढोलेरातील प्रकल्पातून २०२६ मध्ये चिप उत्पादन सुरू करण्याचा आमचा उद्देश आहे. आसाममध्ये उत्पादन लवकर सुरू होईल. आसाममध्ये २०२५ च्या अखेरीस अथवा २०२६ च्या सुरूवातीला उत्पादन सुरू होईल, असे चंद्रशेखरन यांनी नमूद केले.