पीटीआय, नवी दिल्ली

देशातील दूरसंचार क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांवर एकत्रित सुमारे ४.०९ लाख कोटींचे कर्ज आहे. एकीकडे दूरसंचार कंपन्यांनी दरवाढ केली असून त्यांचा प्रति वापरकर्ता महसूल वाढला आहे. तरी त्या तुलनेत त्यांच्यावरील कर्जाचे प्रमाण प्रचंड आहे.

Hexaware Technologies IPO news in marathi
टीसीएसनंतर ‘या’ आयटी कंपनीचा सर्वात मोठा आयपीओ बाजारात येतोय; जाणून घ्या किंमत
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
state bank of india net profit of rs 16891 crore for 3q
देशातील सर्वात मोठ्या ‘या’ बँकेला १६,८९१ कोटींचा निव्वळ नफा; डिसेंबर तिमाहीत ८४ टक्क्यांची वाढ
Mobile phone tariff declined 94 pc since 2014 says Jyotiraditya
मोबाईल फोन सेवांचे दर देशात सर्वाधिक कमी; इतकी स्वस्त झाली सेवा
pune city real estate projects Housing projects
सरकारच्या एका चुकीच्या निर्णयामुळे हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांना खो बसतो तेव्हा…
readers comments on Loksatta editorial
लोकमानस : रेल्वे आता सेवा नव्हे उद्योग
Airtel vs Jio vs Vi Recharge Plans
Airtel vs Jio vs Vi: फक्त कॉल आणि एसएमएस रिचार्जकरिता कोण देत आहे सर्वात स्वस्त प्लॅन? रोजचा खर्च येईल फक्त ५ रुपये
akola reports 5 suspected cases of guillain barre syndrome
सावधान! ‘जीबीएस’ची अकोल्यात धडक, पाच रुग्ण आढळले; एक रुग्ण व्हेंटिलेटरवर

केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री पेम्मासानी चंद्रशेखर यांनी संसदेला दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्च २०२४ अखेरपर्यंत खासगी क्षेत्रातील व्होडाफोन-आयडियावर सर्वाधिक २.०७ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यापाठोपाठ भारती एअरटेलच्या डोक्या वर १.२५ लाख कोटींचा तर जिओ इन्फोकॉमवर ५२,७४० कोटी रुपयांचा कर्ज बोजा आहे. या उलट स्पर्धेत मागे राहिलेली सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलवर केवळ २३,२९७ कोटी रुपयांचे कर्ज आहे, अशी माहिती बुधवारी सरकारकडून देण्यात आली.

हेही वाचा >>>Gold Silver Price Today : लग्नसराई सुरू होताच सोने चांदीचे दर वाढले! एका दिवसात सोने इतक्या रुपयांनी महागले, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

बीएसएनएलवर आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ४०,४०० कोटी रुपयांचे कर्ज होते, मात्र सरकारकडून मिळालेल्या आर्थिक मदतीच्या जोरावर ते २८,०९२ कोटी रुपयांपर्यंत कमी करण्यास यश आले. २०१९ मध्ये बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी पहिल्यांदा ६९,००० कोटी रुपयांची मदत देण्यात आली होती. तर २०२२ मध्ये, पुन्हा १.६४ लाख कोटी रुपयांची मदत देण्यात आली. त्या माध्यमातून नवीन भांडवल उभारणी, कर्जाची पुनर्रचना, ग्रामीण भागात विस्तार करण्यात आला. यामुळे कंपनी २०२०-२१ पासून कार्यचालन नफा नोंदवू शकली. केंद्र सरकारने बीएसएनएलला सुमारे ८९,०० कोटी रुपयांच्या एकूण खर्चासह ४जी आणि ५जी ध्वनिलहरींच्या (स्पेक्ट्रम) वाटपास मान्यता दिली आहे.

Story img Loader