शेतकऱ्यांना दिलासा देत केंद्र सरकारने अनेक पिकांवरची किमान आधारभूत किंमत वाढवली आहे. ही वाढ २०२३-२४ या आर्थिक वर्षातील खरीप पिकांसाठी करण्यात आली आहे. मोदी सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार तूर डाळीच्या किमान आधारभूत किमतीमध्ये प्रति क्विंटल ४०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे, तर धान, मका आणि भुईमुगाच्या किमान आधारभूत किमतीमध्येही वाढ करण्यात आली आहे. याचा फायदा देशातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार असून, नवीन पिकाला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. शेतीचा वाढता खर्च पाहता शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

कोणत्या पिकाचा MSP किती वाढला?

मंत्रिमंडळाने २०२३-२४ साठी उडीद डाळीचा एमएसपी प्रति क्विंटल ३५० रुपयांनी वाढवून ६,९५० रुपये प्रति क्विंटल केला आहे. त्याचबरोबर मक्याचा एमएसपी १२८ रुपये प्रति क्विंटल आणि धानाचा एमएसपी १४३ रुपये प्रति क्विंटलने वाढवून २,१८३ रुपये प्रति क्विंटल करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मोदी मंत्रिमंडळाकडून मूगाच्या एमएसपीमध्ये कमाल ८०३ रुपये प्रति क्विंटलने वाढ करण्यात आली आहे आणि मुगावरील एमएसपी ८,५५८ रुपये प्रति क्विंटलवर गेला आहे.

Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
public sector enterprises disinvestment in fy 24
निर्गुंतवणूक लक्ष्याची सरकारला पुन्हा हुलकावणी! सरकारी मालकीच्या कंपन्यांमधील हिस्सा विक्रीतून १६,५०७ कोटींचा लाभ
fraud with 628 investors
गुंतवणुकीच्या नावाखाली ६२८ गुंतवणूकदारांची ५७९ कोटींची फसवणूक, आरोपी सनदी लेखापालाला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

एमएसपीमध्ये यंदा सर्वाधिक वाढ झाली

मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, कृषी क्षेत्रात आम्ही वेळोवेळी CACP (कृषी खर्च आणि किमती आयोग) च्या शिफारशींच्या आधारे एमएसपी निश्चित करीत आहोत. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा खरीप पिकांसाठी एमएसपीमध्ये झालेली वाढ सर्वाधिक आहे.

हेही वाचाः मोदी सरकार आता ‘या’ कंपनीचा हिस्सा विकणार; ३८ हजार कोटींचा निधी जमवणार

मान्सून सामान्य राहणार

एल निनोचा प्रभाव असला तरी जून ते सप्टेंबर दरम्यान वातावरण सामान्य राहील, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. मात्र, एक जूनला मान्सून केरळमध्ये वेळेवर पोहोचू शकलेला नाही.

हेही वाचाः पीएफमध्ये जमा केलेले आपले कष्टाचे पैसे धोक्यात? EPFOचा शेअर्समधील गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही मोदी सरकारचे कौतुक

शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीसाठी केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. महाराष्ट्रातील सर्व शेतकर्‍यांच्या वतीने केंद्र सरकारचे आभार, असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत.