|| सुहास पाटील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद.) जिल्हा अभियान व्यवस्थापन, पालघर ११ महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीने भरावयाच्या एकुण ५७ जागा. १) प्रभाग समन्वयक (क्लस्टर को-ऑíडनेटर) - ४१ पदे (महिलांसाठी ११ पदे राखीव) पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण (समाजकार्य, कृषी एमबीए ग्रामीण विकास, ग्रामीण व्यवस्थापन यातील पदव्युत्तर पदवीधारकांना प्राधान्य) नियुक्तीचे ठिकाण - पालघर, तलासरी, वसई, वाडा, डहाणू, विक्रमगड, मोखाडा. एकत्रित मानधन - रु. २०,५०० दरमहा. २) प्रशासन व लेखा साहाय्यक - ६ पदे. पात्रता - बी.कॉम. आणि इंग्रजी ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. वेगाची टायिपग परीक्षा उत्तीर्ण. टॅली व एमएस-सीआयटी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण. एकत्रित मानधन - रु. १५,००० ३) डेटा एन्ट्री ऑपरेटर - ५ पदे. पात्रता - दहावी उत्तीर्ण अधिक इंग्रजी ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. वेगाची परीक्षा उत्तीर्ण. शिवाय एमएस-सीआयटी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. एकत्रित मानधन - रु. १०,००० ४) शिपाई - ५ पदे. पात्रता - दहावी उत्तीर्ण. एकत्रित मानधन - रु. ८,०००/- सर्व पदांसाठी संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. परीक्षा शुल्क खुला प्रवर्ग रु. ३७४/-, मागासवर्गीय - रु. २७४/- वयोमर्यादा - खुला प्रवर्ग - ३८ वर्षेपर्यंत, मागासवर्गीय - ४३ वर्षेपर्यंत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज www.mahapariksha.gov.in या संकेतस्थळावर दि. ११ नोव्हेंबर २०१८ पर्यंत करावेत. हेल्पलाईन क्र. १८००३०००७७६६. निवड पद्धती - क्लस्टर को-ऑíडनेटर पद भरतीकरिता - ८० गुणांची संगणक आधारित परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे ८० प्रश्न (मराठी - १४ गुण, इंग्रजी - १४ गुण, सामान्य ज्ञान - १४ गुण, बौद्धिक चाचणी - १४ गुण, सामाजिक शास्त्रे - १४ गुण व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान - १० गुण) मुलाखत - २० गुण. इतर पदांसाठी - १०० गुणांची संगणक आधारीत परीक्षा (मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या विषयावरील प्रत्येकी २० गुण.) सदर पद भरतीसाठी पात्र उमेदवारांची यादी, परीक्षा दिनांक, परीक्षा वेळ व ठिकाण इ. www.mahapariksha.gov.in या संकेतस्थळावर व एमएसआरएलएम, पालघर जिल्हा कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. परीक्षा प्रवेशपात्र उमेदवारांनी वरील संकेतस्थळावरून डाऊनलोड करावेत. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान - जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, बुलढाणा, कंत्राटी पद्धतीने ११ महिन्यांच्या करारावर पुढील ९३ पदांची भरती. १) प्रभाग समन्वयक - ५० पदे (तालुका स्तरावर) पात्रता - पदवी उत्तीर्ण (कृषी/समाजकार्य/रुरल डेव्हलपमेंट इ. पदवीधरांना प्राधान्य. मानधन रु. २०,५००/- २) प्रशासन व लेखा साहाय्यक - १३ पदे. पात्रता - बी.कॉम. आणि इंग्रजी ४० श.प्र.मि./मराठी ३० श.प्र.मि. वेगाची टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण आणि एमएस-सीआयटी व टॅली परीक्षा उत्तीर्ण. मानधन - रु. १५,००० ३) डेटा एन्ट्री ऑपरेटर- १३ पदे. पात्रता - १०वी उत्तीर्ण आणि इंग्रजी ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. टंकलेखन वेगाची परीक्षा उत्तीर्ण. मानधन - रु. १०,०००/- प्रतिमाह. ४) शिपाई - १३ पदे. पात्रता -दहावी उत्तीर्ण आणि जिल्हा स्तरावर इतर ४ पदे. सर्व पदांसाठी ३ वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक. वयोमर्यादा - ३८ वर्षेपर्यंत (मागासवर्गीय - ४३ वर्षेपर्यंत) निवड पद्धती - क्लस्टर को-ऑíडनेटर पद भरतीकरिता - ८० गुणांची संगणक आधारित परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्याची स्वरूपाचे ८० प्रश्न (मराठी - १४ गुण, इंग्रजी - १४ गुण, सामान्य ज्ञान - १४ गुण, बौद्धिक चाचणी - १४ गुण, सामाजिक शास्त्रे - १४ गुण व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान - १० गुण) मुलाखत - २० गुण. इतर पदांसाठी - १०० गुणांची संगणक आधारीत परीक्षा (मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या विषयावरील प्रत्येकी २० गुण.) इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज या संकेतस्थळावर दि. १० नोव्हेंबर २०१८ पर्यंत करावेत. अर्जाचे शुल्क रु. ३७४/- (मागासवर्गीय रु. २७४/-) लेखी परीक्षा दि. २५ नोव्हेंबर २०१८. अंतिम निवड यादी दि. १५ डिसेंबर २०१८ रोजी प्रसिद्ध केली जाईल.