प्रश्नवेध एमपीएससी : रोहिणी शहा

चालू घडामोडी हा सर्वच लेखी परीक्षांचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे या व पुढील काही लेखामध्ये या घटकावरील सर्व प्रश्न देण्यात येत आहेत.

indias first hydrogen powered ferry
विश्लेषण : पंतप्रधान मोदींकडून हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या देशातील पहिल्या बोटीचे उदघाटन, काय आहेत वैशिष्ट्ये? जाणून घ्या…
High Court
अपंगांसाठीचे कायदे पुस्तकापुरते मर्यादित ठेवू नका, दृष्टीहीन महिलेला रेल्वेतील नोकरीबाबत दिलासा देताना उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
Analysis of adulterated food will be expedited report will be available within 14 days
भेसळयुक्त खाद्यपदार्थांचे विश्लेषण वेगात होणार, १४ दिवसांमध्ये मिळणार अहवाल
Experts also demand that the regulatory framework of Finetech needs to be reconsidered to reduce the pressure of regulations eco news
‘फिनेटक’च्या नियामक चौकटीचा पुनर्विचार आवश्यक; नियमावलीची जाचकता कमी करण्याचीही तज्ज्ञांची मागणी

प्रश्न १- पुढीलपकी कोणते विधान अयोग्य आहे?

अ.      संसदेच्या वरिष्ठ सदनास ‘राज्यसभा’ हे नाव सन १९५०मध्ये देण्यात आले.

ब.      नोव्हेंबर २०१९मध्ये राज्यसभेचे २५०वे अधिवेशन सुरू झाले.

क. सन १९५२पर्यंत भारताची संसद एकसदनी होती.

पर्याय

१) केवळ अ       २) केवळ ब

३) केवळ क       ४) वरीलपकी नाही

 

   प्रश्न २ – सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्काराबाबत पुढील विधानांचा विचार करा.

अ.      राष्ट्रीय एकात्मतेसाठी केलेल्या कार्याबद्दल दिला जाणारा हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.

ब.      सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीच्या वर्षी हा पुरस्कार स्थापन करण्यात आला.

क.      हा पुरस्कार व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांना त्यांच्या कार्याबद्दल देण्यात येतो.

वरीलपकी कोणते/ती विधान/ विधाने योग्य आहेत?

१) अ, ब आणि क तिन्ही

२) अ आणि  ब

३) अ आणि क

४) ब आणि क

 

  प्रश्न ३ – ३१ ऑक्टोबर  या दिवसाशी पुढीलपकी कोणत्या बाबी संबंधित आहेत?

अ. आंतरराष्ट्रीय दहशतवादविरोधी दिवस ब. राष्ट्रीय एकता दिवस

क. जागतिक शहरे दिवस                  ड. इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी

पर्यायी उत्तरे

१) अ, ब आणि क  २) ब आणि  ड.  ३) अ, ब आणि ड    ४) ब,  क आणि ड

 

प्रश्न ४ –  भारताच्या संरक्षण दल प्रमुख पदाबाबत पुढीलपकी कोणते विधान बरोबर आहे?

१)      सॅम माणेकशॉ हे पहिले संरक्षण दल प्रमुख होते.

२)      संरक्षण दल प्रमुख हे पद यापूर्वी सन १९६२मध्ये अस्तित्वात आले.

३)      लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये समन्वय साधणे हे या पदाचे मुख्य कर्तव्य आहे.

४)      राष्ट्रपतींना अण्वस्त्रांबाबत सल्ला देण्याचे कार्यही संरक्षण दल प्रमुख करतील.

 

प्रश्न ५ – पुढीलपकी कोणते/कोणती विधान/विधाने चूक आहे/त?

अ.      राज्यामध्ये विद्यार्थी दिवस ७ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येतो.

ब.      जागतिक विद्यार्थी दिन १० ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो.

पर्यायी उत्तरे

१) अ आणि ब  दोन्ही

२) केवळ ब

३) केवळ अ

४) अ आणि ब दोन्ही नाही

 

 प्रश्न ६ – देशातील टाळता येण्याजोग्या माता मृत्यू व अर्भकमृत्यूंचे प्रमाण शून्यावर आणण्याच्या उद्देशाने कोणती योजना केंद्र शासनाकडून सुरू करण्यात आली आहे?

१) सुमन योजना

२) उज्ज्वला योजना

३) संजीवनी योजना

४) जननी सुरक्षा योजना

 

 प्रश्न ७ – सन २०१९मध्ये पुढीलपकी कोणत्या भारतीयाचे नाव आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेकडून एका लघुग्रहास देण्यात आले आहे?

१) सी.व्ही.रामन

२) पंडित जसराज

३) महात्मा गांधी

४) ए.पी.जे. अब्दुल कलाम

उत्तरे व स्पष्टीकरणे

ल्ल    प्र. क्र.१ – योग्य पर्याय क्र. (१).  राज्यसभा स्थापना झाल्यावर सन १९५३ मध्ये संसदेच्या वरिष्ठ सदनाने ठराव करून राज्यसभा हे नामाभिधान स्वीकारले. राज्यसभा लोकसभेप्रमाणे दर पाच वर्षांनी विसर्जति होत नाही. हे संसदेचे स्थायी सदन आहे. दर दोन वर्षांनी राज्यसभेचे एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात आणि त्या जागांसाठी पुन्हा निवडणूक होते. प्रत्येक सदस्याचा कालावधी हा सहा वर्षांचा असतो.

प्र. क्र. २ – योग्य पर्याय क्र. (३) सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म १८७५ साली नाडियाद येथे तर मृत्यू सन १९७०मध्ये झाला. सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार सप्टेंबर २०१९मध्ये स्थापन करण्यात आला आहे. हा पुरस्कार दरवर्षी ३१ ऑक्टोबर या सरदार पटेल यांच्या जयंतीच्या दिवशी जाहीर करण्यात येईल. तो पद्म पुरस्कारांसमवेत राष्ट्रपती भवनामध्ये प्रदान करण्यात येईल. यामध्ये पदक व मानचित्र यांचा समावेश आहे.

 

  प्र. क्र. ३- योग्य पर्याय क्र. (४)

३१ ऑक्टोबर हा सरदार पटेल यांचा जन्म दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून सन २०१४पासून साजरा करण्यात येतो. सन २०१३पासून जागतिक शहरे दिवस हाही ३१ ऑक्टोबर रोजीच साजरा करण्यात येतो.

 

  प्र.क्र. ४ – योग्य पर्याय क्र. (३) संरक्षण दल प्रमुख हे पद सन २०१९मध्ये निर्माण करण्यात आले. मात्र या पदाच्या आवश्यकतेबाबत १९९९च्या कारगील युद्धापासून चर्चा सुरू झाली. कारगील आढावा समितीने तसेच नरेश चंद्रा कृती दलाने या पदाच्या निर्मितीची शिफारस केली. पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यांना संरक्षण आणि व्यूहात्मक बाबींमध्ये सल्ला देण्याचे कार्यही या पदाकडे आहे.

 

प्र. क्र. ५ – योग्य पर्याय क्र.(४)

७ नोव्हेंबर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन राज्यामध्ये तर १० ऑक्टोबर हा डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो.

  प्र. क्र. ६ – योग्य पर्याय क्र.(१) सुरक्षित मातृत्व आश्वासन म्हणजेच

सुमन योजना ही प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानापेक्षा वेगळी योजना आहे. या योजनेमध्ये पुढील बाबी

मोफत उपलब्ध करून देण्यात येतील- किमान चार प्रसूतीपूर्व तपासण्या,

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाअंतर्गत किमान एक तपासणी, फॉलिक अ‍ॅसिड गोळ्या, धनुर्वात लस, तपासणीसाठीचा प्रवास, इतर आवश्यक प्रसूतीपूर्व औषधे व नवजात अर्भकाच्या तपासणीसाठी सहा भेटी.

प्र. क्र. ७ – योग्य पर्याय क्र.(२)

मंगळ आणि गुरू यांच्या दरम्यान असलेल्या लघुग्रहाला पंडित जसराज यांचे नाव देण्यात आले आहे. यापूर्वी विश्वनाथन आनंदसहित एकूण ९ भारतीयांचे नाव लघुग्रहांना देण्यात आले आहे. असा सन्मान मिळणारे पंडित जसराज हे पहिले भारतीय संगीतकार आहेत.