मुख्य परीक्षा पेपर ४ म्हणजेच सामान्य अध्ययन पेपर २ मध्ये भारतीय राज्यघटना, राजकीय व्यवस्था आणि कायदा या घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. या विषयाच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषणावर या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

*    प्रश्न – खालील विधाने विचारात घ्या.

(1)    भारतीय संविधानामध्ये ३६८व्या कलमांतर्गत संविधान दुरुस्तीची तरतूद करण्यात आली आहे.

(2)    २०१२ पर्यंत भारतीय संविधानात ९८ दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत.

(3)    संविधान दुरुस्ती विधेयक सादर करताना राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक असते.

वरीलपकी कोणते / ती विधान /ने बरोबर आहे /त?

१) फक्त (a)               २)(b) आणि (c)   ३) (a) आणि (b)       ४)फक्त (c)

*    प्रश्न – खालीलपकी कोणती जोडी बरोबर जुळते?

१) एका विशिष्ट धर्माच्या उत्तेजनासाठी कर देण्याचे स्वातंत्र्य – अनुच्छेद – २६

२) धार्मिक व्यवहारांच्या व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य – अनुच्छेद – २७

३) ठरावीक शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासनांना उपस्थित राहण्याचे स्वातंत्र्य – अनुच्छेद – २८

४) शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचे प्रशासन करण्याचा अल्पसंख्याकांचा हक्क – अनुच्छेद – २९

*    प्रश्न- पुढीलपकी कोणते विधान योग्य आहे?

(a) राज्य विधानसभेचा सदस्य उपराष्ट्रपती पदासाठी उभा राहू शकत नाही.

(b) राज्यसभेच्या ठरावाने, जो की सदस्यांच्या साध्या बहुमताने संमत केलेला आहे, उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करता येते, त्यात लोकसभेचा काहीही सहभाग नसतो.

१)केवळ (a)    २) केवळ (b)

३) दोन्ही             ४) एकही नाही

*    प्रश्न – मुख्य सचिव हे राज्य प्रशासनसंदर्भात सर्व बाबींवर

मुख्यमंत्र्यांचे —–म्हणून कार्य करतात.

१) सल्लागार           २) प्रमुख सल्लागार      ३) समन्वयक   ४) साहाय्यक

*   प्रश्न – खालीलपकी कोणत्या समितीने पंचायत समितीमध्ये सरपंच परिषद असावी अशी शिफारस केली आहे?

१) वसंतराव नाईक समिती              २) पी. बी. पाटील समिती        ३) एल. एन. बोंगीरवार समित

४) एल. एम. सिंघवी समिती

*    प्रश्न – सर्व शिक्षा अभियानांतर्गत आठव्या इयत्तेपर्यंत सर्व मुलामुलींना सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण देणे हे उद्दिष्ट कोणत्या वर्षांपर्यंत पूर्ण करायचे होते?

१) सन २०१८   २) सन २०१६  ३) सन २०१०   ४) सन २०१६-१८

*    प्रश्न – महाराष्ट्रात स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात कोणता दबावगट अधिक प्रभावशाली झाल्याचे दिसत नाही?

१)  शेतकरी दबावगट    २) कामगार संघटना     ३) व्यापारी उद्योजक दबावगट

४) जातीयवादी संघटना

*    प्रश्न -भारतीय अभियांत्रिकी सेवेची शिफारस  —— केली होती.

१) प्रथम केंद्रीय वेतन आयोगाने

२) दुसऱ्या केंद्रीय वेतन आयोगाने

३) पाचव्या केंद्रीय वेतन आयोगाने

४) तिसऱ्या केंद्रीय वेतन आयोगाने

*    प्रश्न – केंद्र शासनाच्या कर्मचारी निवड आयोगाची स्थापना — मध्ये करण्यात आली.

१)१९६७        २) १९७७

३)१९५०        ४)१९८०

*    प्रश्न –  ——नीतिवचनाचा आधार व हेतू हा भारतीय पुराव्याच्या कायद्यातील कलम १२३चा पाया आहे.

१) नल्ला पोईना साइन लेजी             २) सॉलस पॉप्युलिस्ट सुप्रीमा लेक्स

३) इन बोना पार्टेम                    ४) क्वी फॉसीट पर ऑलीयम फॉसीट पर से

*    प्रश्न – प्रमाणन अधिकारी म्हणजे कलम —- अन्वये डिजिटल सही प्रमाणपत्र देण्यासाठी जिला लायसन्स दिले आहे अशी व्यक्ती.

१) ४८         २) ३५

३) २४        ४) २६

*    प्रश्न – पर्यावरण संरक्षण अधिनियमाच्या तरतुदींचा भंग केल्यास पुढील शिक्षा आहे.

१) १ वर्षांपर्यंत कैद      २) २ वर्षांपर्यंत कैद

३) ५ वर्षांपर्यंत कैद      ४) १० वर्षांपर्यंत कैद

वरील प्रश्नांच्या विश्लेषणातून पुढील मुद्दे समोर येतात.

*     भारतीय राज्यघटनेतील कलमांमधील नेमक्या तरतुदी आणि त्यांच्या अनुषंगाने घडलेल्या लक्षणीय घटना यांवर प्रश्न आले आहेत.

*     शासकीय कामकाजाबाबत कामकाज नियमावली आणि राज्यघटनेतील तरतुदी दोन्हीवर आधारित प्रश्न आहेत.

*     मूलभूत हक्क, नीतिनिर्देशक तत्त्वे, घटनात्मक संस्था/पदे यांवर विश्लेषणात्मक प्रश्नांचे प्रमाण जास्त आहे.

*     स्थानिक शासनाबाबत घटनात्मक तरतुदींसहित संबंधित कायदे व चालू घडामोडींवर प्रश्न विचारलेले आहेत.

*     समर्पक कायद्यांमध्ये मूळ कायद्यातील व्याख्या, शिक्षा/दंडाच्या तरतुदी यांवर फोकस असला तरी सर्वच कलमे माहीत असणे आणि त्याबाबत अद्ययावत माहिती असणे आवश्यक आहे.

*     सर्वोच्च न्यायालयाचे निकाल, शासकीय कामकाजामधील लक्षणीय घडामोडी, निवडणुका यांवर भर देऊन राज्यव्यवस्था विषयाशी संबंधित सर्वच चालू घडामोडी पाहणे आवश्यक आहे. यामध्ये प्रत्यक्ष घडामोड, संबंधित कलम, कायदा, पाश्र्वभूमी यांचा आढावा घेणे आवश्यक आहे.