कर्मचारी निवड आयोगातर्फे केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये ज्युनिअर इंजिनीअर, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, क्वालिटी सव्‍‌र्हेइंग अ‍ॅण्ड काँट्रॅक्टस् या पदांवर नेमणूक करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या कनिष्ठ अभियंता निवड परीक्षेची अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे.
उपलब्ध जागा- या निवड परीक्षेद्वारा भरण्यात येणाऱ्या प्रस्तावित जागांची संख्या १,००० असून त्यापैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव आहेत.
शैक्षणिक अर्हता- अर्जदारांनी सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील पदविका उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा- उमेदवारांचे वय ३२ वर्षांहून अधिक नसावे. वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी सरकारी नियमांनुसार शिथिलक्षम.
निवड पद्धती- अर्जदारांपैकी पात्र उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर ६ डिसेंबर २०१५ रोजी घेण्यात येईल. त्यामध्ये राज्यातील मुंबई व नागपूर या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल. लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना कर्मचारी निवड आयोगातर्फे मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
वेतनश्रेणी व भत्ते- निवड झालेल्या उमेदवारांना केंद्र सरकारच्या विविध आस्थापनांमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून दरमहा ९३००-३४८००+४२०० या वेतनश्रेणीत नेमण्यात येईल. या वेतनश्रेणीतील मूळ वेतनाशिवाय त्यांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार इतर भत्ते व फायदेही देय असतील.
अर्जासह पाठवायचे शुल्क-   निर्धारित टपालघरांमध्ये उपलब्ध असणारी १०० रु.ची केंद्र सरकारची रिक्रुटमेंट तिकिटे विहित अर्जावर लावणे आवश्यक आहे.
अर्जाचा तपशील- अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ११ ते १७ जुलै २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली कर्मचारी निवड आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://ssconline.nic.in अथवा http://ssconline2.gov.in  या संकेतस्थळांना भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याची मुदत- महाराष्ट्रातील अर्जदारांनी संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील, कागदपत्र आणि रिक्रुटमेंट तिकिटांसह असणारे आपले अर्ज क्षेत्रीय संचालक (पश्चिम क्षेत्र), कर्मचारी निवड आयोग, पहिला मजला, साऊथ विंग, प्रतिष्ठा भवन, १०१, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई- ४०००२० या पत्त्यावर १० ऑगस्ट २०१५ पर्यंत पाठवावेत.