आजच्या लेखामध्ये आपण आधुनिक भारताच्या १८५७ ते १९४७ पर्यंतच्या कालखंडाचा परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारा सर्वागीण आढावा घेणार आहोत. सर्वप्रथम आपण या कालखंडाची थोडक्यात उकल करून घेऊ या.

१८५७च्या उठावामुळे कंपनीची सत्ता संपुष्टात आलेली होती आणि भारतावर ब्रिटिश राजसत्तेचे थेट नियंत्रण प्रस्थापित करण्यात आलेले होते. हे सत्तांतर १८५८च्या भारत सरकारच्या कायद्याद्वारे झालेले होते. पण १९व्या शतकामध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी घडत होत्या. या शतकामधील शिक्षित भारतीयांनी पाश्चिमात्य शिक्षणाद्वारे प्राप्त केलेल्या विज्ञान व तत्त्वज्ञानाच्या आधारे, धार्मिक विश्वास, रिवाज व सामाजिक प्रथांची चिकित्सा करण्यास सुरुवात केलेली होती. प्रबोधन युगातील विचार, युरोपातील बौद्धिक विचारप्रवाह, विकास, इ. घटकांमुळे पाश्चिमात्य शिक्षण घेतलेल्या भारतीयांनी सामाजिक व धार्मिक सुधारणा हाती घेतल्या. या सुधारणांनी जातीप्रथा, अस्पृश्यता, सामाजिक आणि कायदेशीर भेदभाव यांसारख्या सामाजिक परंपरा आणि मूर्तिपूजा आणि अंधश्रद्धा यांसारख्या धार्मिक बाबींवर प्रहार करण्यास प्रारंभ केला. या सुधारणांना १९व्या शतकातील सामाजिक आणि धार्मिक चळवळी असे संबोधले जाते. या चळवळी पुरोगामी स्वरूपाच्या होत्या. या चळवळींचा उद्देश व्यक्तिगत समानता, सामाजिक समानता, विवेकवाद, प्रबोधन आणि उदारमतवाद यांसारख्या लोकशाही मूल्यांवर आधारित सामाजिक व्यवस्था प्रस्थापित करणे हा होता.

What is space tourism Gopi Thotakura to be the first Indian space tourist
भारतीय व्यक्ती पहिल्यांदाच करणार अंतराळ पर्यटन; काय आहेत त्यामधील आव्हाने?
Muslim League, Hindu Mahasabha, coalition government, pre independence alliance
मुस्लीम लीग आणि हिंदू महासभेने मिळून स्थापली होती प्रांतिक सरकारे… स्वातंत्र्यपूर्व काळातील आघाडीबद्दल इतिहास काय सांगतो?
Archaeological Survey of India
विश्लेषण: भारतीय संस्कृती संबंधित १८ स्मारके चक्क गायब! भारतीय पुरातत्त्व खातं याला किती जबाबदार?
loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : दावा हास्यास्पद; पण दुर्लक्ष नको..

पाश्चिमात्य शिक्षणामुळे भारतीयांनी आधुनिक विवेक, धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि राष्ट्रवादी राजकीय दृष्टिकोनाचा अंगीकार केलेला होता. इंग्रजी भाषेने देशात राष्ट्रवादाची वाढ होण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली होती. ही भाषा भारतातील विविध प्रदेशांतील उच्चशिक्षित लोकांची वैचारिक देवाणघेवाण करण्याचे माध्यम बनली. पाश्चिमात्य शिक्षणामुळे देशात स्वातंत्र्य, समता व बंधुता या संकल्पना रुजण्यास सुरुवात झाली व शिक्षित भारतीयांमध्ये दृष्टिकोन आणि हितसंबंध यामध्ये काहीसा एकसारखेपणा निर्माण झाला. याच्या जोडीला काही भारतीयांनी ब्रिटिश साम्राज्यवादाच्या आíथक धोरणाची समीक्षा करून ब्रिटिशांची आíथक धोरणे भारतीयांचे कसे शोषण करत आहेत हे दाखवून दिले. या सर्वाचा एकत्रित परिणाम असा झाला की भारतामध्ये राष्ट्रवादाची उभारणी झाली व १८८५मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आली. येथूनच पुढे स्वातंत्र्यप्राप्तीसाठी भारतीय राष्ट्रीय चळवळीची उभारणी करण्यात आली.

साधारणत: भारतीय राष्ट्रीय चळवळीचे तीन टप्पे केले जातात –

१८८५ ते १९०५ (मवाळ कालखंड)

१९०५-१९२०(जहाल कालखंड)

१९२० ते १९४७ (गांधी युग)

या टप्पानिहाय भारतीय राष्ट्रीय चळवळीतील इतर प्रवाह या अंतर्गत क्रांतिकारी चळवळी, खालच्या जातीच्या चळवळी, कामगार चळवळ, भारतीय संस्थाने व संस्थानमधील प्रजेच्या चळवळी, भारतीय राष्ट्रीय चळवळीमधील महिलांचे योगदान, आधुनिक भारताच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण व्यक्ती तसेच गव्हर्नर जनरल आणि व्हाइसराय यांचे कार्य व ब्रिटिशांच्या काळातील भारतातील घटनात्मक विकास यांसारख्या बाबींचा अधिक विस्तृत आणि सखोल अभ्यास करावा लागणार आहे.

या घटकावर २०१३ ते २०१६मध्ये घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षांमध्ये एकूण १० प्रश्न विचारण्यात आलेले होते, जे खालीलप्रमाणे होते –

२०१३मध्ये विचारलेले प्रश्न

‘वय, लिंगभाव आणि धर्म यांसारखी बंधने झुगारून भारतीय महिला स्वातंत्र्यलढय़ात अग्रेसर राहिल्या.’ चर्चा करा.

परदेशी व्यक्तींनी भारतात राहून वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये भाग घेतला. भारतीय स्वातंत्र्यलढय़ात त्यांनी घेतलेल्या भूमिकांचे विश्लेषण करा.

मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडातील योगदानाची चर्चा करा.

२०१४ मध्ये विचारलेले प्रश्न

नौदलाचा उठाव म्हणजे भारतातील ब्रिटिश वसाहतिक महत्त्वाकांक्षेच्या शवपेटिकेला लागलेला शेवटचा खिळा असल्याचे कशा प्रकारे सिद्ध झाले?

जगामध्ये घडलेल्या कोणत्या राजकीय, आíथक आणि सामाजिक घडामोडींनी भारतातील वसाहतविरोधी संघर्षांला प्रेरणा दिलेली होती?

२०१५ मध्ये विचारलेले प्रश्न

भारताला स्वातंत्र्य प्राप्त करणे महात्मा गांधीजींविना कसे भिन्न राहिले असते? चर्चा करा.

भिन्न पद्धती आणि धोरणे असूनही, ‘महात्मा गांधी’ आणि ‘डॉ. बी. आर. आंबेडकर’ यांचे दलितांचे जीवन उत्तम बनविणे हे एकसमान ध्येय होते. स्पष्टीकरण द्या.

स्वतंत्र भारतासाठी संविधानाचा मसुदा फक्त तीन वर्षांमध्ये तयार करण्याचे ऐतिहासिक कार्य संविधान सभेला पूर्ण करणे कठीण गेले असते, पण १९३५च्या भारत सरकारच्या कायद्याच्या अनुभवामुळे करता आले. चर्चा करा.

२०१६ मध्ये विचारलेले प्रश्न

स्वातंत्र्यलढय़ामध्ये विशेषत: गांधीवादाच्या काळामध्ये महिलांच्या भूमिकेची चर्चा करा.

स्वातंत्र्यलढय़ामधील सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी यांच्या भिन्न दृष्टिकोनावर प्रकाश टाका.

वरील प्रश्नांवरून आपणाला या घटकाची कशी तयारी करावी याची एक योग्य दिशा निर्धारित करता येऊ शकते. तसेच यातील अनेक महत्त्वपूर्ण बाबींवर प्रश्न विचारण्यात आलेले नाहीत त्यामुळे सर्वप्रथम या घटकाची मूलभूत माहिती अभ्यासून या विषयाच्या विविध पलूंचे योग्य आकलन करणे महत्त्वाचे ठरते. कारण हा घटक पारंपरिक पद्धतीचा आहे आणि यावर विचारण्यात येणारे प्रश्न

बहुतांश वेळा सर्वागीण पलूंचा विचार करून विश्लेषणात्मक पद्धतीने विचारले जातात आणि अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरे लिहिणे खूपच कठीण जाते, म्हणून विषयाचे योग्य आकलन आणि चिकित्सक पद्धतीने केलेला अभ्यास यासाठी अधिक उपयुक्त ठरू शकतो. या घटकाची मूलभूत माहिती आपणाला एनसीईआरटीच्या आधुनिक भारताशी संबंधित पुस्तकामधून मिळते आणि या विषयाची सर्वागीण आणि सखोल तयारी करण्यासाठी ग्रोवर आणि ग्रोवर लिखित ‘आधुनिक भारताचा इतिहास’, बिपन चंद्र लिखित इंडियाज स्ट्रगल फॉर इण्डिपेंडन्स आणि शेखर बंडोपाध्याय लिखित ‘प्लासी टू पार्टशिन’ यासारख्या संदर्भग्रंथांचा उपयोग होतो. यापुढील लेखामध्ये आपण ‘स्वातंत्र्योत्तर भारत’ या घटकाची चर्चा करणार आहोत.