Success story of IAS Deshal Dan Ratnu: जर तुमचा इरादा पक्का असेल तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला तुमचं यश गाठण्यापासून रोखू शकत नाही, असं म्हणतात. अशीच एक प्रेरणादायी कथा आहे देशल दान रतनूची, जो राजस्थानच्या जैसलमेर येथील एका गरीब कुटुंबात वाढला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मर्यादित संसाधने आणि कोणतेही प्रशिक्षण नसतानाही, देशल दानने केवळ UPSC परीक्षा उत्तीर्णच केली नाही तर ८२ वा अखिल भारतीय रँक मिळवून इतिहासही रचला.
देशल दान रतनूचं शिक्षण
देशल दान रतनू याचा जन्म राजस्थानमधील जैसलमेर येथे झाला. तो लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता. मोठे झाल्यावर अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न होते. तो नेहमी त्याच्या वर्गात अव्वल होता. मेहनतीच्या जोरावर तो पुढे जात राहीला. IIT जबलपूरमधून त्याने अभियांत्रिकीची पदवी घेतली. दरम्यान, त्याने यूपीएससीची तयारी सुरू केली आणि अभ्यासात नियमितता राखली.
आर्थिक परिस्थितीला आव्हान देऊन गेला पुढे
देशल दान गरीब कुटुंबातील होता. त्याचे वडील चहाचे दुकान चालवत होते आणि कुटुंबात सात भाऊ आणि बहिणी होत्या. मोठे कुटुंब चालवण्याची जबाबदारी त्याच्या वडिलांवर होती. कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे त्याची अवस्था बिकट होत होती, पण या परिस्थितीला त्याने यशाच्या मार्गात अडथळा बनू दिला नाही.
भावाची प्रेरणा कामी आली
देशल दानचा मोठा भाऊ भारतीय नौदलात होता आणि २०१० मध्ये तो शहीद झाला, ही घटना त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. त्याचा भाऊ नेहमी त्याला अधिकारी व्हायला सांगत असे. यातून प्रेरित होऊन त्याने यूपीएससीच्या तयारीसाठी स्वत:ला पूर्णपणे झोकून दिले. कोणतेही प्रशिक्षण न घेता त्याने स्वबळावर यूपीएससीची तयारी केली. वेळेच्या व्यवस्थापनावर भर दिला. नोट्स बनवणे, उजळणी करणे आणि मागील वर्षाच्या पेपरचा सराव करणे हा त्याच्या स्ट्रॅटेजीचा भाग होता. देशल दान रतनूने पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि ८२ वा क्रमांक मिळवून IAS अधिकारी झाला.
मर्यादित संसाधने आणि कोणतेही प्रशिक्षण नसतानाही, देशल दानने केवळ UPSC परीक्षा उत्तीर्णच केली नाही तर ८२ वा अखिल भारतीय रँक मिळवून इतिहासही रचला.
देशल दान रतनूचं शिक्षण
देशल दान रतनू याचा जन्म राजस्थानमधील जैसलमेर येथे झाला. तो लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता. मोठे झाल्यावर अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न होते. तो नेहमी त्याच्या वर्गात अव्वल होता. मेहनतीच्या जोरावर तो पुढे जात राहीला. IIT जबलपूरमधून त्याने अभियांत्रिकीची पदवी घेतली. दरम्यान, त्याने यूपीएससीची तयारी सुरू केली आणि अभ्यासात नियमितता राखली.
आर्थिक परिस्थितीला आव्हान देऊन गेला पुढे
देशल दान गरीब कुटुंबातील होता. त्याचे वडील चहाचे दुकान चालवत होते आणि कुटुंबात सात भाऊ आणि बहिणी होत्या. मोठे कुटुंब चालवण्याची जबाबदारी त्याच्या वडिलांवर होती. कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे त्याची अवस्था बिकट होत होती, पण या परिस्थितीला त्याने यशाच्या मार्गात अडथळा बनू दिला नाही.
भावाची प्रेरणा कामी आली
देशल दानचा मोठा भाऊ भारतीय नौदलात होता आणि २०१० मध्ये तो शहीद झाला, ही घटना त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. त्याचा भाऊ नेहमी त्याला अधिकारी व्हायला सांगत असे. यातून प्रेरित होऊन त्याने यूपीएससीच्या तयारीसाठी स्वत:ला पूर्णपणे झोकून दिले. कोणतेही प्रशिक्षण न घेता त्याने स्वबळावर यूपीएससीची तयारी केली. वेळेच्या व्यवस्थापनावर भर दिला. नोट्स बनवणे, उजळणी करणे आणि मागील वर्षाच्या पेपरचा सराव करणे हा त्याच्या स्ट्रॅटेजीचा भाग होता. देशल दान रतनूने पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि ८२ वा क्रमांक मिळवून IAS अधिकारी झाला.