Premium

UPSC-MPSC : राज्यशास्त्र : ऐतिहासिक पार्श्वभूमी – भाग १ : रेग्युलेटिंग ॲक्ट १७७३

Indian polity for UPSC in Marathi : या लेखातून आपण ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटिश सरकार यांच्या कार्यकाळात लागू केलेल्या महत्त्वाच्या कायद्यांबाबत जाणून घेऊ या.

Indian polity for UPSC in Marathi
रेग्युलेटिंग ॲक्ट १७७३ ( फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम )

ब्रिटिश महाराणी एलिझाबेथ यांनी इ.स. १५९९ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला भारतात व्यापार करण्याचे एकाधिकार दिले. त्यानुसार इ.स. १६०० मध्ये ईस्ट इंडिया कंपनी भारतात व्यापार करण्यासाठी आली. इ.स. १७६५ पर्यंत कंपनीचे काम केवळ व्यापारापुरतेच मर्यादित होते. मात्र, १७६४ मध्ये बक्सरच्या युद्धात ईस्ट इंडिया कंपनीने मुघलांचा पराभव केला. या पराभवानंतर तत्कालीन मुघल बादशहा शाहआलम द्वितीय आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात अलाहाबाद येथे एक तह झाला. या तहानुसार ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल, उडिसा आणि बिहारमध्ये महसूल गोळा करण्याचे अधिकार मिळाले. त्यामुळे बंगाल पूर्णपणे कंपनीच्या नियंत्रणाखाली आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इ.स. १८५७ मध्ये भारतात ब्रिटिशांविरोधात उठाव झाला. या उठावानंतर ब्रिटिश सरकारने भारतातील कंपनीचे शासन संपुष्टात आणत सर्व अधिकार आपल्या ताब्यात घेतले. पुढे स्वातंत्र्यानंतर भारतात एका संविधानाची आवश्यकता जाणवली. या संविधानाची संकल्पना एम. एन. राय यांनी मांडली. त्यासाठी १९४६ मध्ये संविधान सभेची स्थापना करण्यात आली. पुढे २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान अस्तित्वात आले. भारतीय संविधानातील अनेक गोष्टी या ब्रिटिशांनी लागू केलेल्या कायद्यातून घेण्यात आल्या. या कायद्यांचा भारतीय संविधानावर मोठा प्रभाव दिसून येतो. या लेखातून आपण ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटिश सरकार यांच्या कार्यकाळात लागू केलेल्या महत्त्वाच्या कायद्यांबाबत जाणून घेऊ या.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Upsc mpsc indian polity historical background of indian constitution spb