राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये कृषी घटक हा पेपर एक आणि चारमध्ये विभागून समाविष्ट करण्यात आला आहे. दोन्ही पेपरमधील या घटकावर विचारण्यात आलेले प्रश्न एकत्रित विचारात घेऊन त्यांचे विश्लेषण केल्यास या घटकाचा सलग अभ्यास करणे सोपे होते. मागील तीन वर्षांमध्ये या घटकावर विचारण्यात आलेले प्रातिनिधिक प्रश्न व त्यांचे विश्लेषण या लेखामध्ये पाहू. प्रश्न - प्रकाश तीव्रता जेथे प्रकाशसंश्लेषणाचा दर फक्त श्वसनक्रियेची गरज भागविण्याएवढा समान असतो त्याला काय म्हणतात? १) भरपाई बिंदू २) प्रकाश संश्लेषण बिंदू ३) प्रकाश बिंदू ४) संपृक्तता बिंदू प्रश्न - खालील वाक्ये वाचून योग्य पर्याय निवडा. एका ऋतू किंवा वर्षांत एकूण पर्जन्य हा साधारण पर्जन्यापेक्षा ७५%ने कमी झाल्यास त्यास अवर्षण काळ म्हणतात. जर पर्जन्याची तूट ही २६ ते ५० टक्के इतकी असेल तर त्यास साधारण अवर्षण म्हणतात. जर पर्जन्याची तूट ही ५० टक्केपेक्षा जास्त असेल तर त्यास तीव्र अवर्षण म्हणतात. पर्यायी उत्तरे १) केवळ (a) आणि (c) चुकीची २) केवळ (a) आणि (b) चुकीची ३) केवळ (c) चुकीचे ४) सर्व विधाने बरोबर आहेत प्रश्न - पुढील दोन विधानांपकी कोणते अयोग्य आहे? भात पिकास फुटवे येण्याच्या अवस्थेवेळी तापमान सर्वसाधारणपणे ३१० सें. ग्रे. असावे लागते. अंडी उत्पादनाकरिता योग्य तापमान १०- १६० सं. ग्रे. असते. पर्यायी उत्तरे १) केवळ (a) २) केवळ (b) ३) दोन्ही ४) दोन्ही नाही प्रश्न - वनस्पतीच्या तळाच्या पानापासून वपर्यंत हरितद्रव्य नाहिसे होणे हे -- च्या कमतरतेचे लक्षण आहे. १) तांबे २) मँगनीज २) मॅग्नेशियम ४) गंधक प्रश्न - खालीलपकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्य़ांच्या मुख्य भागाचा समावेश अवर्षणाच्या खरीप व रब्बी कृषी हवामानाच्या विभागात होतो? अहमदनगर, सोलापूर, सांगली. अहमदनगर, भंडारा, गडचिरोली. सोलापूर, कोल्हापूर, सांगली. अमरावती, बीड, अकोला. पर्यायी उत्तरे १) (a) व (b) २) (b) व (c) ३) फक्त (a) ४) फक्त (a) प्रश्न - मातीची धूप कृषीविद्याविषयक उपाययोजनेद्वारे नियंत्रित करता येते जेव्हा जमिनीचा उतार -- टक्के इतका असेल. १) दोनपेक्षा कमी २) दोनपेक्षा जास्त ३) सहा ते दहा ४) वरीलपकी नाही प्रश्न - खालील विधानांपकी कोणते / ती विधान / ने चुकीचे / ची आहे/त? भारतातील पंजाब हे मोठय़ा प्रमाणात गहू उत्पादन करणारे राज्य आहे. भारतातील मध्य प्रदेश हे सर्वात जास्त प्रमाणात डाळीचे उत्पादन करणारे राज्य आहे. भारतातील महाराष्ट्र हे कापसाचे प्रमुख उत्पादन करणारे राज्य आहे. भारतातील पश्चिम बंगाल हे ऊसाचे मुख्य उत्पादन करणारे राज्य आहे. पर्यायी उत्तरे १) (a) व (b) २) (c) व (d) ३) फक्त (b) ४) फक्त (d) प्रश्न - भारतातील पीक पद्धतीवर परिणाम करणारे घटक पिकांची फेररचना. किमती व उत्पन्न महत्तम करणे. शेतीचा आकार. जोखीम स्वीकारणारा विमा. आदानाची उपलब्धता. भूधारणा पद्धती पर्यायी उत्तरे - १) (a), (d) व (c) २) (d) व (c) ३) वरील सर्व चूक ४) वरील सर्व बरोबर प्रश्न - शेतीविषयक अर्थसाहाय्याबाबत पुढीलपकी कोणते विधान चुकीचे आहे? १) खतांसाठी दिले जाणारे अर्थसाहाय्य ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. २) वीजपुरवठय़ासाठी दिले जाणारे अर्थसाहाय्य ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. ३) खतांसाठी दिलेल्या अर्थसाहाय्याचे एक उद्दिष्ट म्हणजे खताच्या उद्योगाकडे अधिक भांडवल आकर्षति करणे. ४) जलसिंचनासाठीच्या अर्थसाहाय्यामुळे कालव्याच्या पाण्याच्या झालेल्या कमी किमती हे भूपृष्ठ पाण्याच्या अकार्यक्षम वापरास कारणीभूत आहे. प्रश्न - पुढीलपकी कोणते विधान अयोग्य आहे? (a) एकूण कार्यरत लोकसंख्येत शेतमजुरांचे प्रमाण सन १९५१ ते २०१०, २५% पासून २०% पर्यंत कमी झाले. (b) लागवड करणाऱ्यांचेही प्रमाण सन १९५१ ते २०१०, ५०% पासून सुमारे ३०% पर्यंत कमी झाले. पर्यायी उत्तरे १) केवळ (a) २) केवळ (b) ३) दोन्ही ४) एकही नाही प्रश्न - सागरी उत्पादन निर्यातीस चालना देण्यासाठी १९७२साली --स्थापना करण्यात आली. १) APEDA २) MPEDA ३) CACP ४) NCDC वरील प्रश्नांचे व्यवस्थित अवलोकन केल्यास तयारी करताना पुढील बाबी विचारात घेणे आवश्यक आहे, हे लक्षात येते. पिक पद्धती, पिकांचे वितरण, पिकांच्या वाढीचे शास्त्र या बाबी पेपर एकमध्ये तर पिकांची उत्पादकता, उत्पादनाचे प्रमाण, संशोधन संस्था, त्यासाठीच्या योजना, आíथक आदाने, विपणन हे मुद्दे पेपर चारमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. जलव्यवस्थापन, हवामान, मान्सून, मृदा निर्मिती व वितरण, हवामान विभाग हे भौगोलिक घटक पेपर एकमध्ये समाविष्ट आहेत. जागतिक स्तरावरील कृषी उत्पादनांचे क्रम, अर्थव्यवस्थेतील कृषी क्षेत्राचा वाटा, जागतिक व्यापार संघटनेतील शेतीविषयक तरतूदी, कृषी व पोषणविषयक शासकीय योजना या बाबी पेपर चारमध्ये समाविष्ट आहेत. कृषी वित्तपुरवठा, त्याबाबतच्या राज्य, देश व जागतिक स्तरावरील संस्था, इतर वित्तीय संस्था हे मुद्दे पेपर चारमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. या घटकातील समर्पक मुद्दय़ांचे दोन पेपरमध्ये विभाजन करण्यात आले असले तरी हा घटक एकसंधपणे अभ्यासल्यास जास्त व्यवहार्य ठरते. काही मुद्दे त्या त्या पेपरमधील घटकांवर भर देऊन त्या त्या वेळी पुन्हा पाहिल्यास अभ्यासक्रम व्यवस्थित कव्हर होईल.