आजच्या लेखामध्ये आपण आधुनिक भारताअंतर्गत येणारी भारतीय स्वातंत्र्य चळवळ या विषयाची पूर्वपरीक्षेसाठी तयारी कशी करावी, याची चर्चा करणार आहोत. या विषयावर २०११ ते २०१७ मध्ये एकूण ३६ प्रश्न विचारण्यात आलेले होते.

भारतीय स्वातंत्र्य चळवळ या विषयाची तयारी करताना प्रामुख्याने भारतीय राष्ट्रवाद आणि त्याच्या उदयाची कारणे, विविध प्रादेशिक राजकीय संघटना, १८८५ मधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आणि येथून पुढे स्वातंत्र्यप्राप्तीसाठी संघटित पद्धतीने सुरू झालेला लढा, त्याचबरोबर राष्ट्रीय चळवळीची सर्वसाधारणपणे तीन टप्प्यांतील विभागणी अभ्यासणार आहोत. मवाळ अथवा नेमस्त कालखंड (१८८५-१९०५), जहालवादी कालखंड (१९०५-१९१९) आणि गांधी युग (१९२० -१९४७) तसेच याला समांतर असणारे भारतीय स्वातंत्र्य चळवळीमधील इतर प्रवाह. या प्रवाहांमध्ये कामगार चळवळ, क्रांतिकारी चळवळ इत्यादींचा समावेश होतो. याचबरोबर स्वराज पार्टी, आझाद िहद सेना, भारतीय स्वातंत्र्य चळवळीमधील महिलांचे योगदान, भारतीय सांप्रदायिकतेचा उदय, मुस्लीम लीग, हिंदू महासभा, भारतीय संस्थाने व संस्थानामधील प्रजेच्या चळवळी, खालच्या ज्ञातीतील चळवळी, आधुनिक भारताच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण व्यक्ती तसेच गव्हर्नर जनरल (व्हाइसरॉय) आणि भारतमंत्री, १८५७च्या नंतरचे ब्रिटिश संसदेने पारित केलेले कायदे- १८५८, १८६१, १८९१, १९०९, १९१९, १९३५ व १९४७ ज्यांना आपण ब्रिटिशकालीन भारतातील घटनात्मक विकास म्हणून पाहतो तसेच सायमन कमिशन, गोलमेज परिषद, ऑगस्ट ऑफर, क्रिप्स मिशन, वॉवेल प्लॅन, कॅबिनेट मिशन इत्यादीशी संबंधित मूलभूत माहिती असणे गैरजेचे आहे.

गतवर्षीय परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न व त्यांचे स्वरूप

२०११ मध्ये, १९४२ च्या चले जाव चळवळीचे कोणते निरीक्षण सत्य नाही? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यासाठी पर्याय होते

१) ही एक हिंसक चळवळ होती, २) याचे नेतृत्व महात्मा गांधीजींनी केले होते, ३) ही एक उत्स्फूर्त चळवळ होती आणि ४) कामगारांना आकर्षति करून घेता आले नाही असे चार पर्याय दिलेले होते, यातील अचूक निरीक्षण ओळखून योग्य पर्याय निवडायचा होता.

२०१२ मध्ये, भारतीय राष्ट्रीय चळवळीमध्ये दादाभाई नौरोजींचे सर्वात महत्त्वाचे योगदान कोणते होते? हा प्रश्न विचारण्यात आला होता. यासाठी

१) ब्रिटिशांकडून भारतीयांची होणारी आर्थिक पिळवणूक उघड केली, २) प्राचीन भारतीय साहित्याचा अर्थ स्पष्ट करून भारतीयांचा आत्मविश्वास वाढविला आणि ३) काही करण्यापूर्वी सामाजिकदृष्टय़ा दुष्ट प्रवृत्तीचे उच्चाटन करण्याच्या गैरजेवर भर दिला. अशी तीन विधाने देण्यात आलेली होती. यापैकी योग्य विधान/विधाने कोणती हे निवडायचे होते.

२०१३ मध्ये, इलबर्ट बिल कशाशी संबंधित होते? त्यासाठी

१) भारतीयांना शस्त्र बाळगण्यासाठी निश्चित स्वरूपाचे निर्बंध लादणे, २) भारतीय भाषांमध्ये प्रकाशित होणारी वृत्तमानपत्रे आणि मासिकावर निर्बंध लादणे, ३) युरोपियन लोकांवर खटला चालविण्यासाठी भारतीयांना घातलेली अपात्रता काढून टाकणे आणि ४) आयात केलेल्या सुती कपडय़ांवरील कर काढून टाकणे. असे चार पर्याय देण्यात आलेले होते. यातील योग्य पर्याय कोणता असे विचारण्यात आलेले होते.

२०१४ मध्ये, १९२९ चे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन भारतीय इतिहासामध्ये का महत्त्व पूर्ण मानले जाते? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यासाठी

१) स्व-सरकार मिळविणे हे काँग्रेसचे उद्दिष्ट आहे ही घोषणा केली, २) पूर्ण स्वराज मिळविणे हा काँग्रेसचा उद्देश आहे, याची घोषणा केली,

३) असहकार चळवळ सुरू करण्यात आली आणि ४) लंडनमध्ये होणाऱ्या गोलमेज परिषदेत सहभाग घेण्याचा निर्णय घेण्यात आला. असे चार पर्याय देण्यात आलेले होते आणि यातील योग्य पर्याय निवडायचा होता.

२०१५ मध्ये, खालीलपैकी कोणत्या चळवळीमुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विभाजन होऊन मवाळवादी आणि जहालवादी गटांचा उदय झाला? असा प्रश्न होता. त्यासाठी

१) स्वदेशी चळवळ, २) चले जाव चळवळ, ३) असहकार चळवळ आणि ४) सविनय कायदेभंग चळवळ हे चार पर्याय देण्यात आलेले होते. यातून योग्य पर्याय निवडायचा होता.

२०१६ मध्ये, मोत्तेगु चेम्सफोर्ड प्रस्ताव कशाशी संबंधित होता? हा प्रश्न होता. यासाठी १)सामजिक सुधारणा, २) शैक्षणिक सुधारणा, ३) पोलीस प्रशासनातील सुधारणा आणि ४) घटनात्मक सुधारणा असे पर्याय देण्यात आलेले होते. यातील योग्य पर्याय निवडायचा होता.

२०१७मध्ये, बट्लर समिती, १९२९ चा ट्रेड डिस्पुट कायदा, १८८१ चा फॅक्टरी कायदा, तसेच द्विदलशासन पद्धती (ऊ८ं१ूँ८)  इत्यादीवर प्रश्न विचारण्यात आलेले होते.

या विषयाचा अभ्यास करताना आपणाला वस्तुनिष्ठ माहितीचे संकलन, तसेच व्यक्तिविशेष माहिती, विविध चळवळी आणि संबंधित घडामोडी, इत्यादी पलूंच्या आधारे या विषयाचे आकलन करणे गैरजेचे आहे. पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टीने त्या विषयांचे सखोल आणि व्यापक पलू लक्षात घेऊन तयारी करावी लागते. या विषयाची मूलभूत माहिती अभ्यासण्यासाठी बिपीन चंद्र लिखित आधुनिक भारतावरील जुने एनसीईआरटीचे पुस्तक अभ्यासावे. त्यानंतर या विषयाचा अधिक सखोल अभ्यास करण्यासाठी बिपीन चंद्र लिखित इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स, बी. एल. ग्रोवर आणि बी. एस. ग्रोवर लिखित आधुनिक भारताचा इतिहास, सुमित सरकार लिखित आधुनिक भारत इत्यादी संदर्भग्रंथ वाचावेत. या संदर्भग्रंथांवर आधारित स्वतच्या नोट्स तयार कराव्यात, जेणेकरून हा विषय कमीतकमी वेळेमध्ये अभ्यासला जाऊ शकतो.