नोव्हेंबर २००८ मध्ये आदर्श शाळा योजना अमलात आली. प्रति गट - एक शाळा या प्रमाणात बुद्धिमान ग्रामीण बालकांना दर्जेदार शिक्षण देता यावे यासाठी उत्कृष्टतेचा मापदंड असणाऱ्या आदर्श शाळा उभारणे, हा या योजनेचा उद्देश आहे. योजनेची वैशिष्टय़े - प्रत्येक गटामध्ये दर्जेदार उच्च माध्यमिक शाळा उपलब्ध करणे. किमान एक उद्दिष्ट निश्चित करणे. नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम आणि शिक्षणक्रमाचा वापर करणे. पायाभूत सुविधा, अभ्यासक्रमाचा, मूल्यमापन आणि शालेय प्रशासनासंदर्भात आदर्श भूमिका योजनेच्या अंमलबजावणीचे दोन प्रकार - शैक्षणिकदृष्टय़ा मागास भागांमध्ये राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशांमार्फत शैक्षणिकदृष्टय़ा मागास नसलेल्या भागांमध्ये सार्वजनिक- खासगी भागीदारीमार्फत.