मागील लेखामध्ये सामान्य अध्ययन पेपर १ मधील भूगोल या घटकाचा अभ्यास करण्यासाठी लागणाऱ्या संदर्भग्रंथाचा आढावा घेतलेला आहे. अभ्यासक्रमामध्ये जगाचा भूगोल असे नमूद केलेले आहे. आपणाला भूगोल या घटकाची परीक्षेच्या दृष्टीने तयारी करताना या विषयाची विभागणी स्वतंत्रपणे दोन घटकांमध्ये करावी लागते. – पहिला घटक हा भारताचा भूगोल आणि दुसरा घटक जगाचा भूगोल. यामध्ये प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल ज्यामध्ये सामाजिक व आर्थिक भूगोल, आणि वसाहत भूगोल अशी विभागणी असते. प्रस्तुत लेखामध्ये भारताचा व जगाचा भूगोल कसा अभ्यासावा याचबरोबर मुख्य परीक्षेमध्ये (२०१३-२०१६ पर्यंत) या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा विश्लेषणात्मक आढावा घेणार आहोत. भूगोल या घटकावर २०१३,२०१४,२०१५ व २०१६च्या मुख्य परीक्षेमध्ये अनुक्रमे ७, १०, ७ आणि ८ प्रश्न विचारण्यात आलेले होते. या प्रश्नांचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, भूगोल या विषयामधील जवळपास सर्व घटकांवर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि सर्वाधिक भर हा भारताच्या भूगोलावर आहे, पण बहुतांश  प्रश्न प्राकृतिक आणि आर्थिक घटकांचा एकत्रित संबंध जोडून विचारण्यात आलेले आहेत. मुख्य परीक्षेमध्ये सर्वाधिक प्रश्न भारताचा भूगोल या घटकावर विचारले जातात. ज्यामध्ये भारताची प्राकृतिक

रचना, आर्थिक व सामाजिक पद्धती तसेच लोकसंख्या यांसारख्या वैशिष्टय़पूर्ण पलूवर अधिक भर असतो. याचबरोबर जगाचा भूगोल या घटकावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची संख्या तुलनेने कमी असते. या विषयाचे स्वरूप  री्रे- Semi-Scientific  असल्यामुळे या विषयाचा संकल्पनात्मक पाया, संबंधित प्रदेशाची प्राकृतिक रचना, आर्थिक व सामाजिक पद्धती तसेच लोकसंख्या इत्यादींची सखोल माहिती असणे गरजेचे आहे. यातील अनेक प्रश्न हे विषयाच्या पारंपरिक ज्ञानासह चालू घडामोडीशी जोडून विचारले जातात. म्हणून विषयाचे पारंपरिक ज्ञान व चालू घडामोडी यांची योग्य सांगड घालून या विषयाची परीक्षेच्या दृष्टीने तयारी करणे क्रमप्राप्त ठरते.

गतवर्षीय प्रश्न-विश्लेषणात्मक आढावा

२०१३च्या मुख्य परीक्षेमध्ये ‘दक्षिण भारतातील राज्यामध्ये नवीन साखर उद्योग स्थापन करण्याचा कल वाढत आहे. याच्याशी तुम्ही सहमत आहात का? समर्थनासह चर्चा करा.’ असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. हा प्रश्न भारताच्या आर्थिक भूगोलाशी संबंधित आहे. पण यासाठी काही भौगोलिक कारणे महत्त्वाची ठरतात व त्यांचा उल्लेख उत्तरामध्ये करणे अपेक्षित आहे. साखर उद्योग स्थापन करण्यासाठी  नसíगकरीत्या पूरक असणारे घटक व उपलब्ध साधनसंपत्ती, सक्षम दळणवळणाचे उपलब्ध पर्याय व यासाठी पूरक असणारी जमीन ज्यामध्ये ऊस हे पीक घेणे अधिक उपयुक्त ठरते. इत्यादी माहितीची चर्चा उत्तरामध्ये करणे अपेक्षित आहे.

२०१४च्या मुख्य परीक्षेमध्ये ‘‘उष्णदेशीय चक्रीवादळे ही दक्षिण चिनी समुद्र, बंगालचा उपसागर आणि मेक्सिकोचे आखात यांसारख्या प्रदेशांत मोठय़ा प्रमाणात मर्यादित असतात, कारण..’’ असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. हा प्रश्न प्राकृतिक भूगोलातील  हवामान घटकाशी संबंधित आहे व जगातील तीन भौगोलिक स्थानाशी जोडला गेलेला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित भौगोलिक स्थानांची प्राकृतिक रचना तसेच या प्रदेशातील हवामानपद्धती व याच प्रदेशमध्ये ही चक्रीवादळे इतर प्रदेशाच्या तुलनेत अधिक प्रमाणात असतात, याची कारणे सर्वप्रथम माहिती असणे आवश्यक आहे. या प्रश्नांचा रोख हा उष्णदेशीय चक्रीवादळांसाठी नेमके कोणते घटक (प्राकृतिक) जबाबदार आहेत याकडे आहे. उत्तरामध्ये फक्त यासाठीची कारणे अपेक्षित आहेत. ज्यामुळे प्रश्नाला अनुसरून असणारी सुसंगत व समर्पक माहिती उत्तरामध्ये आपण देऊ शकतो.

२०१५च्या मुख्य परीक्षेमध्ये ‘‘मुंबई, कोलकाता आणि दिल्ली ही देशातील तीन महानगरे आहेत, पण यामध्ये दिल्लीमधील वायुप्रदूषण हे मुंबई व कोलकाता या महानगरांच्या तुलनेत अधिक असून एक गंभीर समस्या आहे व हे असे का आहे.’’ असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. या प्रश्नाचा कल हवामान व पर्यावरणसंबंधी अनुषंगाने होता, पण याचबरोबर या शहरांची भौगोलिक स्थाने व यासाठी कोणती प्राकृतिक घटक, त्याचबरोबर औद्योगिकीकरण व शहरीकरण इत्यादी गोष्टींचा एकत्रित विचार करून उत्तर लिहिणे अपेक्षित आहे.

२०१५च्या मुख्य परीक्षेमध्ये ‘‘भारतातील स्मार्ट शहरे, स्मार्ट खेडय़ाशिवाय शाश्वत होऊ शकत नाहीत.’’ या विधानाची ग्रामीण व नागरी एकत्रीकरणाच्या पाश्र्वभूमीवर चर्चा करा, असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. या प्रश्नांचे योग्य आकलन होण्यासाठी स्मार्ट शहरे आणि स्मार्ट खेडे या संकल्पनांमध्ये काय अंतर्भूत आहे याची माहिती असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शहरांचे ग्रामीण भागावरील अवलंबित्व कशा प्रकारचे आहे? जर शहरे स्मार्ट करावयाची आहेत तर स्मार्ट खेडय़ाशिवाय, स्मार्ट शहरे कशी शाश्वत होऊ शकत नाहीत याचा एकत्रित विचार करून हा प्रश्न सोडवावा लागतो. ज्यासाठी सद्यस्थितीमध्ये ग्रामीण व नागरी जीवनाशी संबंधित समस्या व त्यावर योजलेले उपाय याचाही आधार हा प्रश्न सोडविताना विचारात घ्यावा लागतो.

२०१६ मध्ये ‘सद्यस्थितीमध्ये दक्षिण चिनी समुद्राचे भूराजकीय महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे. भाष्य करा,’ असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. या प्रश्नाला योग्य पद्धतीने समजून घेण्यासाठी आपणाला या समुद्राचे नेमके भौगोलिक स्थान

काय आहे, येथील उपलब्ध साधनसंपत्ती व येथून होणारा सागरी व्यापार इत्यादी बाबींचा प्रामुख्याने विचार करून याचे भूराजकीय महत्त्व अधोरेखित करावे लागते. तेव्हाच याचे समर्पक उत्तर आपणला लिहिता येते. उपरोक्त चर्चा या विषयाचा परीक्षाभिमुख पद्धतीने अभ्यास करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. या पुढील लेखामध्ये आपण ‘प्राकृतिक भूगोल’ या घटकाचा सर्वागीण आढावा घेणार आहोत.