राज्यसेवा मुख्य परीक्षा आता अगदी तोंडावर आली आहे. उद्यापासून सुरू होणारी ही परीक्षा १६, १७, १८, १९ सप्टेंबर अशी चालणार आहे. भाषा पेपर १ सोडल्यास सर्व पेपर्स बहुपर्यायी स्वरूपाचे आहेत. पश्नपत्रिकेतील प्रश्नसंख्या व ते सोडविण्यासाठी मिळणारा वेळ यांची सांगड घालून वेळेचे व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे. याबाबत या लेखामध्ये चर्चा..

परीक्षा हॉलमध्ये उत्तरपत्रिका मिळाल्यावर तुमचा क्रमांक, विषय, सेंटर इ. माहिती खडाखोड न करता काळजीपूर्वक भरून घ्यावी. बॉक्समध्ये लिहिलेले आकडे आणि अक्षरे व त्यांच्या खालील माìकग यात फरक असू नये याची काळजी घ्यावी. लक्षात ठेवा ही उत्तरपत्रिका डटफ शीट असल्याने खाडाखेड, फाटणे, चुरगळणे, घाण होणे अशा गोष्टीमुळे तपासलीच जात नाही. त्यामुळे पुढील बाबी गांभीर्याने लक्षात घ्याव्यात.

  • प्रश्नपत्रिका मिळाल्यावर तिचा कोड आधी उत्तरपत्रिकेत नोंदवून घ्यावा.
  • सामान्य अध्ययनाच्या ४ पेपर्समध्ये १२० मिनिटांत १५० प्रश्न सोडवायचे आहेत. तर भाषा विषयाच्या बहुपर्यायी पेपरमध्ये ६० मिनिटांत ५० प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामुळे वेळेचे नियोजन आणि डटफ शीटची काळजी या अत्यंत आवश्यक बाबी आहेत हे लक्षात घ्यावे.
  • सगळी प्रश्नपत्रिका वाचत बसू नका. हातात पडल्याबरोबर लगेचच सोडवायला सुरुवात करा. जे प्रश्न सोडवता येतात ते सोडवून पेन्सिलने त्याच्या उत्तराला खूण करत पुढे जायचे.
  • एखाद्या प्रश्नाबाबत काही गोंधळ किंवा शंका असेल, अवघड वाटला असेल तर त्या प्रश्नाच्या क्रमांकाला प्रश्नपत्रिकेमध्ये खूण करून पुढच्या प्रश्नाकडे वळावे. असे करत प्रश्न सोडवायचा पहिला राऊंड संपवावा. जेवढे प्रश्न सोडवले आहेत त्यांचे उत्तरपत्रिकेत माìकग करून घ्यावे किंवा प्रश्न सोडवतानाच उत्तर पत्रिकेमध्ये माìकग केले तरी हरकत नाही. पण त्यावेळी आपण सोडून दिलेल्या प्रश्नासमोर माìकग करत नाही ना, योग्य प्रश्न क्रमांकासमोरच करत आहोत ना हे काळजीपूर्वक पाहावे.
  • आता दुसरा राऊंड – अवघड वाटणारे प्रश्न सोडवायचा पुन्हा प्रयत्न करायचा. आधीच अशा खुणा केल्याने हे प्रश्न शोधत बसण्यात वेळ वाया जात नाही.
  • थोडासा गोंधळ असणारे ओळखीचे प्रश्न सोडवताना आपल्या अंत:प्रेरणेवर विश्वास ठेवावा. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत करण्यात आलेल्या सर्वेमधून ही गोष्ट समोर आली आहे की विद्यार्थ्यांला सर्वात पहिल्यांदा जे उत्तर बरोबर आहे असे वाटत असते, तेच बहुतेक वेळा बरोबर असते.
  • अवघड वाटणारे प्रश्न सगळ्यात शेवटी सोडवायचा प्रयत्न करावा पण जोपर्यंत आपण शोधलेले उत्तर बरोबर आहे याची खात्री वाटत नाही तोपर्यंत उत्तर पत्रिकेत खुणा करू नयेत.
  • अनोळखी वाटणाऱ्या प्रश्नांना हातच लावायचा नाही. अन्यथा नकारात्मक गुणांचा दंड लागू शकतो. जो महागात पडतो.
  • पूर्व आणि मुख्य परीक्षेत बहुविधानी (multi statement) स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. प्रश्न वाचनानंतर उत्तर आठवले हे तथ्यात्मक (factual) प्रश्नाबाबत ठिक आहे. पण बहुविधानी प्रश्न मात्र मूलभूत तपशील विचारणारे (concept based) असतात. त्यामुळे असे प्रश्न व्यवस्थित समजून घेऊनच उत्तरांचे पर्याय वाचावेत. किमान दोन वेळा प्रश्न वाचावा. तितक्याच दक्षतेने उत्तरांचे पर्याय वाचून मगच उत्तराची खूण  रंगवावी.
  • एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट एमपीएससीच्या उत्तरपत्रिका या non-leaded OMR sheet स्वरूपाच्या असतात. त्यांच्यावर बॉलपेनाने खुणा रंगवायच्या असतात. त्यामुळे काळजीपूर्वक करायला हवे.

ओमएमआर शीटची काळजी

ओएमआर शीटवर तुम्ही रंगवलेले गोळे तुमचे भविष्य ठरवतात. म्हणूनच या शीटची विशेष काळजी घ्यायला हवी. १२० मिनिटांच्या परीक्षेत १५० गोळे रंगवायला किमान २५ मिनिटांचा वेळ लागतो. हा वेळ काळजीपूर्वक वापरला पाहिजे. कारण फक्त एका प्रश्नाचा क्रम चुकला की त्यापुढच्या सगळ्याच प्रश्नांचा क्रम चुकलेला असतो. परिणामी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याचा प्रयत्न फसलेला असतो. एक प्रश्न सोडवून तो शीटवर नोंदवा किंवा सगळे प्रश्न सोडवून झाल्यांअंती शेवटी एकाचवेळी नोंद करा, यातला पर्याय तुम्ही, तुमच्या सोयीने निवडा. पण उत्तरे नोंदवण्याचे काम सावधगिरीने केले पाहिजे.