नीतीशास्त्राच्या अभ्यासामध्ये कायमच पुढील तीन सिद्धांतांचा प्रामुख्याने विचार केला जातो.

१) उपयुक्ततावादी मांडणी (जेरेमी बेंथम, जे.एस. मिल)

२) कर्तव्यवादी विचारसरणी (इमॅन्युएल कान्ट)

३) सद्गुणांवर आधारित विचारसरणी (प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल)

याआधी आपण पहिल्या दोन विचारसरणींची ओळख करून घेतली होती. आज आपण तिसऱ्या आणि शेवटच्या विचारणीची ओळख करून घेणार आहोत.

सद्गुणांवर आधारित नतिक विचारसरणी

नैतिक तत्त्वज्ञानाच्या अगदी सुरुवातीच्या जडणघडणीपासून या मांडणीकडे पाहू या. सॉकेटीसचा शिष्य असलेल्या प्लेटोने त्याच्या स्वत:च्या कारकिर्दीत व येणाऱ्या काळात अथेन्स व सर्व जगाला चकित करून सोडले. याचबरोबर अ‍ॅरिस्टॉटलसारखा तत्त्ववेत्ता बनवण्याचे कामही त्याने केले. अतिशय मोठय़ा प्रमाणात साहित्य निर्मिती व विचारनिर्मिती करणाऱ्या प्लेटोचे सर्वात महत्त्वाचे सद्धांतिक काम  The Republica यामधून केले गेले आहे.  The Republica मधील एकंदरीत विवेचनात नीतीनियमांविषयी (Ethics) खालील दोन प्रमुख मुद्दे स्पष्ट केले आहेत.

१) नीतीनियम सापेक्ष नसतात.

२) नीतीनियम न्यायाची संकल्पना स्पष्ट करतात व न्याय मिळवण्याच्या प्रक्रियेतील टप्पे समजावून घेण्यासाठी नितीनियमांच्या चौकटीचा उपयोग होतो. प्लेटोने नतिक निर्णयक्षमतेचा गाभा मनुष्याच्या ठायी असलेले मूलभूत सद्गुण आहेत, अशी मांडणी केली. माणसाला पूर्णत्व प्रदान करणाऱ्या पुढील गुणांना प्लेटोने मूलभूत सद्गुण (Cardinal Virtues) म्हटले –

(१) धर्य  (Fortilude),

(२) संयम (Temperance),

(३) शहाणपण (Wisdom), आणि

(४) न्याय (Justice)

प्लेटोच्या मते या चार एकमेकांपासून सुटय़ा गोष्टी नव्हेत. एकाच संघटित व्यक्तिमत्त्वाचे ते विविध पलू आहेत. त्यातील अधोरेखित करायची बाब म्हणजे, न्याय हा गुण इतर गुणांचे एकमेकांवर अतिक्रमण होऊ देत नाही. वरीलपैकीपहिल्या तीन गुणवैशिष्टय़ांचा उत्तम विकास झाल्यास त्यांची परिणती चौथ्यात म्हणजे न्यायात होते.

प्लेटोचा शिष्य अ‍ॅरिस्टॉटल यानेदेखील नीतीनियमविषयक सद्गुणांवर आधारित सवयी रुजविण्यावर व जोपासण्यावर भर दिला. त्यांच्या मते, प्रत्येक गोष्टीची ओढ तिच्या स्वाभाविक स्थितीकडे म्हणजेच ‘स्व’त्त्वाकडे असते. मग असा प्रश्न पडतो की, माणसाचे स्वत्त्व कशात आहे, माणसाचा खरा ‘स्व’भाव कोणता. अ‍ॅरिस्टॉटलच्या मते, विवेक (Reason) हेच माणसाचे स्वत्त्व आहे. माणसाची ओढ विवेकाकडे असली पाहिजे. अ‍ॅरिस्टॉटलच्या मांडणीतील पुढचा महत्त्वाचा विचार म्हणजे, प्रत्येक वस्तूस काही कार्य  (Function) असते. ते कार्य व्यवस्थित करणे हेच तिचे कल्याण अथवा चांगलेपण होय. उदा. चप्पलचे कार्य पायाचे संरक्षण करणे आहे असे मानले, तर ‘चांगली’ चप्पल तिच असू शकेल जी हे कार्य व्यवस्थितपणे पार पाडते. याच धर्तीवर, मनुष्य या दृष्टीने माणसाचे कार्य काय, याचे अ‍ॅरिस्टॉटलच्या मते ‘विवेकाने वागणे’ असे उत्तर आहे. विवेकपूर्ण असणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वत्त्व आहे.

मात्र विवेकी असण्यामध्ये साधारणत: जी भावनाशून्यता गृहीत धरली जाते, ती अ‍ॅरिस्टॉटलला अपेक्षित नाही. किंबहुना, भावना न नाकारता माणसाच्या अनेक उर्मी, प्रवृत्ती, वासना आणि आकांक्षा असतात. त्यांच्यातील संघर्ष टाळून संवाद निर्माण करणे हे विवेकाचे काम होय. विवेकयुक्त जीवन म्हणजे एकसंध व्यक्तिमत्त्व  (integrated personality) असा अर्थ अ‍ॅरिस्टॉटलच्या मनात आहे. माणसाने स्वत:च्या स्वत्त्वाप्रमाणे म्हणजे विवेकाला अनुसरून वागणे याचा अर्थ सद्गुणी जीवन जगणे हा होय.

इ.स.पूर्व ३७० च्या सुमारास मांडलेल्या या विचारांमध्ये प्रचंड सामथ्र्य आहे. आपण या आधी पाहिलेल्या नतिक विचारांचे मूळ निर्णयातून मिळणाऱ्या सुखात किंवा उपयुक्ततेत, कर्तव्याच्या जाणिवेत, न्यायपूर्ण भूमिकेत दडलेले होते. मात्र प्लेटो-अ‍ॅरिस्टॉटलचा नतिक विचार व्यक्तीतील स्वाभाविकत: नतिक असणाऱ्या गुणांवर भर देतो. केवळ परिणामांचा, सुखाचा, कर्तव्याचा विचार करून व्यक्तीच्या नतिक धारणांचा विचार पूर्ण होत नाही, हे विसाव्या शतकात पुन्हा नव्याने मान्य झाले आहे व नतिक निर्णयांमध्ये कळीची ठरणारी व्यक्तीची भूमिका पुन्हा एकदा अभ्यासली जात आहे. कान्टबरोबरच मार्टनि ह्युम, नित्शे या सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने सद्गुणांवर आधारित नतिक विचारसरणीला बळ दिले आहे.

या टप्प्यावर आपण सर्व प्रमुख नैतिक विचारसरणींची ओळख करून घेतली आहे. नतिक तत्त्वज्ञानाच्या इतिहासाच्या आणि जडणघडणीच्या विविध टप्प्यांचा मागोवा घेणे आणि यूपीएससीच्या सामान्य अध्ययनाच्या चौथ्या पेपरच्या दृष्टीने या विचारांची प्रस्तुतता स्पष्ट करणे हा या लेखामागील प्रमुख हेतू आहे.

(प्रस्तुत लेखकांनी नीतीशास्त्र, सचोटी आणि नसíगक क्षमता या पुस्तकाचे लेखन केले आहे.)