सांधे दुखणे, सूज येणे, वेदना होणे यालाच आपण संधिवात/ एक झीज होणारा आजार म्हणतो. चालताना गुडघे दुखणे/ जमिनीवर बसता न येणे/ मांडी घालता न येणे/ पायांमध्ये बाक येणे वगरे त्रास परिचयाचे आहेत. चाळिशी ओलांडल्यावर सुरू होणारे त्रास जसजसं वय वाढतं तसे वाढतच जातात आणि शरीराची हालचाल नेहमीसारखी न होता वेदनामय होते. वयानुसार हाडे ठिसूळ होतात, कॅल्शिअम/ जीवनसत्त्व डची कमतरता भासते हे जरी सत्य असलं तरी आहारातून हा त्रास कमी व्हायचा काही मार्ग नक्कीच आहे.यासाठी आहारात आवश्यक बदल- * आहारात निसर्गात असलेल्या अल्कधर्मी अन्न, फळे आणि भाज्या समाविष्ट करावीत. उदा. सॅलड्स किंवा ज्यूस, कोिशबीर (गाजर, बीट रस विशेष उपयुक्त) * उपयुक्त फळे : सफरचंद, अननस, संत्रे, मोसंबी, केळी, पेअर, जर्दाळू, इत्यादी* बद्धकोष्ठ (constipation) टाळावे. * हलका व्यायाम फायदेशीर आहे. * शरीराचे वजन सामान्य ठेवा. हे टाळा -* संधिवाताचा त्रास वाढवणारे पदार्थ * कडक/ अतिप्रमाणात चहा किंवा कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स * पापड, लोणचे इत्यादी खारे पदार्थ* साखरेचा/ मिठाचा अति वापर* सोडा,जंकपदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ. उदा. नुडल्स, बिस्किट्स, ब्रेड, पाव वगरे* मांसाहारी पदार्थ* वांगी, बटाटे, टोमॅटोसारख्या भाज्या.दिवसाची सुरुवात एका उत्तम न्याहारीने करा* एक ग्लास (साखर न घातलेले) गायीचे दूध किंवा २ टीस्पून ओट्स/ नाचणीसत्त्व/ राजगिरा लाडू/ सोयाबीन अथवा सातूचे पीठ , * २ अक्रोड / ३-४ भिजवलेले बदाम* ताजे फळ त्रास सहन करण्यापेक्षा असे बदल केल्याने वेदना पूर्ण गेल्या नाहीत तरी कमी व्हायला नक्कीच मदत होईल.वैदेही अमोघ नवाथेआहारतज्ज्ञ