अर्चना जगदीश
उद्या प्लास्टिक पिशवीमुक्त दिन. असा दिन पाळावा लागतो, कारण आजही लोक प्लास्टिकच्या भस्मासुराकडे म्हणावं तितकं गांभीर्याने पाहात नाहीत. दरवर्षी समुद्रात येणाऱ्या ३० कोटी टन प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावली गेली नाही तर २०५० पर्यंत पृथ्वीवरच्या समुद्रांमध्ये मासे आणि इतर जीवांपेक्षा प्लास्टिकच जास्त असेल. ज्याचा गंभीर परिणाम निसर्गावर आणि पर्यायाने मानवावर होऊ शकतो. आज अनेक जण चहा किंवा खाण्याचे गरम पदार्थ प्लास्टिक पिशवीतून आणतात. यातून पोटात जाणारे अतिसूक्ष्म प्लास्टिक आरोग्याला अत्यंत अपायकारक ठरतं. प्लास्टिकला आणि प्लास्टिक पिशवीला नकार हाच आरोग्यदायी आयुष्याचा मार्ग आहे. उद्याच्या (३ जुलै) आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवीमुक्त दिनानिमित्तानं सर्वानाच हे आवाहन..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रायगड जिल्ह्यातल्या हाशिवरे गावाजवळ अंबा नदीला मिळणारी एक छोटी खाडी.. या खाडीत आजूबाजूला कांदळवन असले तरी प्रचंड कचरा होता. मुख्यत: एकदाच वापरल्या जाणाऱ्या पिशव्या आणि प्लास्टिकच्या बाटल्या. हे प्लास्टिक इथे असेच साठत राहिले तर कांदळवन म्हणजे मॅन्ग्रूव्हज नाहीसे होणार हे सांगायला संशोधनाची गरज नव्हती. कृती तर करायला हवीच होती, मग आमचे स्वयंसेवक आणि गावकरी यांच्या मदतीने ८०० मीटर रुंदीचा नाला आणि कांदळवनांच्या परिसरातून प्लास्टिक गोळा करायला सुरुवात केली. दिवसभरात एक टन प्लास्टिक गोळा झाले..

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Refuse plastic bags hashivare village in raigad district amy
First published on: 02-07-2022 at 01:34 IST