साधना दधिच
प्रीती करमकर हे स्त्री चळवळीतील एक उभरते नेतृत्व होते. वयाच्या अवघ्या ५१व्या वर्षीच तिला आकस्मिक मृत्यू येणे, हा स्त्रियांच्या चळवळीला व ‘नारी समता मंच संस्थे’ला बसलेला मोठा धक्का आहे. तिच्या अचानक जाण्याने स्त्री चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. प्रीतीने समाजशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि आता ती आपला डॉक्टरेट प्रबंध लिहीत होती. पुणे विद्यापीठाच्या ‘स्त्री अभ्यास केंद्रा’त काम केल्याने स्त्रीवादाचा अभ्यास, त्या अभ्यासाची शिस्त तिला होतीच. प्रत्यक्ष तळागाळातल्या कामाचा अनुभव हवा म्हणून ती ‘नारी समता मंच’मध्ये सहभागी झाली. सुरुवातीलाच भीमाशंकर येथील आदिवासी क्षेत्रात तिने मुक्कामी राहून काम सुरू केले. तिथे तिने स्त्रिया व आरोग्य यावरचा प्रकल्प हाताळला आणि लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध स्थापित केले. कामाच्या ठिकाणी स्त्रियांवर होणाऱ्या ‘लैंगिक छळ’विरोधी जे ‘विशाखा आदेश’ आले त्यावर तिने काम केले. पाच जिल्ह्यांत या कार्यशाळा घेतल्या आणि त्यातूनच एक पाहणी करायचे ठरवले. ‘विशाखा समिती’बाबत विविध कार्यस्थळी सर्वेक्षण केले (२००१). अभ्यासात आलेले निष्कर्ष दुर्दैवी होते. अवघ्या ९ टक्के कार्यालयात अशा समित्या होत्या. असे सर्वेक्षण तेव्हा भारतात पहिल्यांदाच होत होते, लोकसभेत या कायद्यावर चर्चा झाली तेव्हा मंचाच्या अभ्यासाची मागणी झाली व कायदा निर्मिती प्रक्रियेत उपयोगही झाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा