निकाली काढण्यास २०२१ पर्यंत मुदत
गोव्यातील कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेडसह पंधरा वर्षांच्या पुढील सर्वच बसगाडय़ा निकाली काढण्यात याव्यात असा आदेश राज्य सरकारने काढला आहे. सार्वजनिक वाहतुकीतील सरकारी संचालित कंपनी असलेल्या केटीसीएलसह पंधरा वर्षांपुढील सर्व खासगी गाडय़ाही निकाली काढण्यात याव्यात असे वाहतूक संचालक सुनील मासुरकर यांनी सांगितले. या आदेशाची प्रत पीटीआय वृत्तसंस्थेला मिळाली असून, त्यात म्हटल्यानुसार मार्च २०२१पर्यंत १५-२० वर्षे जुन्या असलेल्या सर्व गाडय़ा निकाली काढण्यात येतील.