२० वर्षांपूर्वी म्हणजे २००१ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कोलकत्ता येथील ईडन गार्डनवर झालेल्या कसोटी सामन्यात कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वोत्तम भागिदाराची नोंद झाली. व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड या भारताच्या दोन सर्वोत्कृष्ट फलंदाजांनी याची नोंद केली.

नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर स्टीव्ह वॉच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४४४ धावांची मजल मारली. भारताच्या हरभजनसिंगने या डावात हॅट्रिक घेतली होती . प्रत्युत्तरादाखल सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारताचा डाव १७१ धावांत संपुष्टात आला आणि त्यामुळे फॉलो ऑनची नामुष्की भारताला पत्करावी लागली.

Australia vs New Zealand 1st Match Updates in Marathi
NZ vs AUS : ग्रीन-हेझलवूडची शेवटच्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी, कॅमेरूनच्या शतकाने सावरला ऑस्ट्रेलियाचा डाव
kl rahul still not fit likely to miss 5th Test against england in dharamsala
केएल राहुल अजूनही जायबंदीच;अखेरच्या कसोटी सामन्यातही खेळण्याची शक्यता कमीच
Ranji Trophy Mumbai's Tushar Deshpande and Tanush break the 78 year old record by scoring centuries against Baroda
Ranji Trophy : मुंबईच्या तुषार-तनुषने मोडला ७८ वर्षांपूर्वीचा विक्रम, बडोद्याविरुद्ध खेळताना रचला इतिहास
Mumbai vs Baroda Ranji Trophy Trophy Hardik Tamore century
हार्दिक तामोरेची शतकी खेळी

यावेळी भारताने चांगली सुरुवात केली आणि चार गडी गमावून २३२ धावा केल्या. त्यानंतर लक्ष्मण आणि द्रविड यांच्यात भागीदारीला सुरूवात झाली ज्यामुळे मॅचचं वारंच पलटलं. ग्लेन मॅकग्राने बाद केले त्याआधी लक्ष्मणने २८१ धावा फटकावल्या होत्या. द्रविड १८० धावा काढून बाद झाला. भारताने ६५७ वर ७ आपला डाव घोषित केला आणि पाहुण्या संघाला ३८४ धावांचे आव्हान दिले.

कसोटीच्या शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा डाव २१२ धावांमध्ये आटोपला. भारताने १७१ धावांनी ही कसोटी जिंकली

या भागिदारीच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त बीसीसीआयने आपल्या ट्विटरवरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, #२००१ मध्ये, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविडने कोलकाताच्या ईडन गार्डनवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार भागिदारीचे प्रदर्शन केले.