देशभरात एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असला, तरी करोनावर मात करणाऱ्यांच्या संख्याही वाढताना दिसत आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत देशभरात ३ लाख ३४ हजार ८२२ जणांनी करोनावर मात केली आहे. २९ जूनपर्यंत देशभरात एकूण ८६ लाख ८ हजार ६५४ नमूने तपासणी करण्यात आली आहे. यातील २ लाख १० हजार २९२ नमूने काल तपासले गेले आहेत. The total number of samples tested up to 29 June is 86,08,654 of which 2,10,292 samples were tested yesterday: Indian Council of Medical Research (ICMR) pic.twitter.com/wEaE4lERVS — ANI (@ANI) June 30, 2020 देशभरात चोवीस तासांत करोनामुळे ४१८ जणांचा मृत्यू झाला असून, १८ हजार ५२२ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या ५ लाख ६६ हजार ८४० वर पोहचली आहे. सध्या २ लाख १५ हजार १२५ जणांवर उपचार सुरू आहेत. तर, आतापर्यंत करोनामुळे देशभरात एकूण १६ हजार ८९३ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. 418 deaths and 18,522 new #COVID19 cases in the last 24 hours; Positive cases in India stand at 5,66,840 including 2,15,125 active cases,3,34,822 cured/discharged/migrated & 16,893 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/7tw1fTBYxz — ANI (@ANI) June 30, 2020 देशात तसंच जगभरात करोनानं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत करोनावरील लस विकसित करण्यासाठी सर्वच देश प्रयत्न करत आहेत. करोनावरील लस विकसित करणाऱ्या देशांमध्ये भारतदेखील आघाडीवर आहे. परंतु अशातच सोमवारी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारत बायोटेकनं करोनावरील लस COVAXIN तयार केल्याची सोमवारी घोषणा केली. आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी (एनआयव्ही) यांच्यासोबत मिळून त्यांनी यशस्वीरित्या भारतातील पहिली करोना लस तयार केली आहे.