देशातील करोना संसर्गाचा वेग काहीसा मंदावला असला तरी, अद्यापही करोनाबाधितांच्या व करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत दररोज भर पडतच आहे. दिलासादायक बाब म्हणजे मागील २४ तासांमध्ये ४३ हजार ८५१जण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. सणासुदीच्या काळात लोकं मोठ्याप्रमाणावर घराबाहेर पडत असल्याने, संसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. गत २४ तासांत देशभरात ३० हजार ५४८ नवे करोनाबाधित आढळले असून, ४३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. With 30,548 new #COVID19 infections, India's total cases rise to 88,45,127. With 435 new deaths, toll mounts to 1,30,070 Total active cases at 4,65,478 after a decrease of 13,738 in the last 24 hrs Total discharged cases at 82,49,579 with 43,851 new discharges in last 24 hrs pic.twitter.com/7zRLIB7VCM — ANI (@ANI) November 16, 2020 देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ८८ लाख ४५ हजार १२७ वर पोहचली आहे. सध्या देशात ४ लाख ६५ हजार ४७८ अॅक्टिव्ह केसेस असून, १ लाख ३० हजार ७० रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. याचबरोबर आतापर्यंत ८२ लाख ४९ हजार ५७९ जणांनी करोनावर मात केली आहे. A total of 12,56,98,525 samples tested for #COVID19 up to 15th November, of these 8,61,706 samples were tested yesterday: Indian Council of Medical Research (ICMR) pic.twitter.com/2x1xe2ZyOM — ANI (@ANI) November 16, 2020 १५ नोव्हेंबरपर्यंत देशभरात करोनाच्या पार्श्वभूमीवर १२,५६,९८,५२५ नमूने तपासण्यात आले. यापैकी ८ लाख ६१ हजार ७०६ नमुन्यांची काल तपासणी झाली असल्याची माहिती आयसीएमआरकडून मिळाली आहे. India continues to have one of the lowest cases per million population globally. Fifteen States and Union Territories have cases per million lower than the national average: Union Health Ministry pic.twitter.com/0nj7eiV4Un — ANI (@ANI) November 16, 2020 जगभरात करोनाची दुसरी लाट आल्याचे बोलले जात असताना, भारतातील परिस्थिती काहीसी दिलासादायक दिसत आहे. सध्या भारतात सध्या १० लाख लोकसंख्येमागे सर्वात कमी ६ हजार ३८७ रुग्ण आहेत. तर त्यातही दिलासादायक बाब म्हणजे १५ राज्य व केंद्रशासीत प्रदेश असे आहेत, जिथं देशाच्या सरासरीपेक्षा कमी रुग्ण आहेत.