बिहारच्या खागरीया जिल्ह्यामध्ये रविवारी पहाटे कटिहार ते अमृतसर जाणा-या आम्रपाली एक्सप्रेसला अपघात झाला. कटीहारच्या दिशेने जाणा-या आम्रपाली एक्सप्रेसचे सात डब्बे आज रुळावरुन घसरले. खागरीया जिल्ह्यात पसरहा स्थानकाजवळ हा अपघात झाला.
आम्रपाली एक्स्प्रेसमधील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. आम्रपाली एक्सप्रेसचे पाच स्लीपर आणि दोन वातानुकूलित डब्बे रुळावरुन घसरले. या अपघातामुळे राजधानी एक्सप्रेससह अन्य रेल्वेंचे मार्ग बदलण्यात आल्याची माहिती रेल्वेचे प्रवक्ता अनिल सक्सेना यांनी दिली.