बिहारमध्ये सहरसा जिल्ह्यात पतीच्या चितेवर उडी मारून एका ६५ वर्षीय महिलेने आपले जीवन संपविले. दहवा देवी असे या महिलेचे नाव असून, तिच्या पतीचे शनिवारी कर्करोगाने निधन झाले. रविवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून सर्व कुटुंबीय व नातेवाईक घरी आले. मात्र घरी आल्यावर दहवा देवी न दिसल्याने मुलांनी शोध घेण्यास सुरुवात केली. स्मशानभूमीजवळ त्या होत्या, असे काही नातेवाईकांनी सांगितल्यानंतर सर्वानी तिकउे धाव घेतली. मात्र तोपर्यंत दहवा देवी यांनी चितेवर उडी मारून जीवन संपविले होते.