संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या दिल्ली सामूहिक बलात्कार घटनेला आज, सोमवारी एक वर्ष पूर्ण होत असताना अद्याप स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटनांत घट झाल्याचे चित्र नाही. कायदा कठोर करूनही वर्षभरात अत्याचाराच्या घटनांत दुप्पट वाढ झाल्याचे वास्तव समोर आले आहे. कायद्याचे कवच असूनही महिलावर्ग अजूनही असुरक्षित असल्याचेच अधोरेखित झाले आहे. दिल्लीसह सर्वच महत्वाची शहरे महिलांसाठी असुरक्षित असल्याचे यातून स्पष्ट होत आहे          
भीषण आकडेवारी
१४९३ – ३० नोव्हेंबर २०१३ पर्यंतच्या बलात्काराच्या गुन्ह्य़ांची दिल्लीतील नोंदणी
२२९- ऑगस्ट २०१३ पर्यंतचे मुंबईतील बलात्काराचे गुन्हे दाखल