पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील सभेत आपचे नेते अरविंद केजरीवाल यांचा नामोल्लेख टाळत टीकास्त्र सोडले होते. त्याला केजरीवाल यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजपकडे कुठलेच विकासाचे धोरण नसल्याने ते वैयक्तिक टीका करत असा आरोप केजरीवाल यांनी केला. दिल्लीतील भाजप म्हणजे कप्तानाशिवाय जहाज अशी अवस्था असल्याची टिप्पणी त्यांनी केली. भाजपवर वैयक्तिक टीका करणार नाही, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.दरम्यान, रामलीला मैदानाबाहेर आम आदमी पक्षाने फलक झळकावत भाजपने आतापर्यंत कोणती आश्वासने पूर्ण केली याचे उत्तर द्यावे, असा जाब विचारण्यात आला होता.