अबकी बार, खो दी सरकार असा उपरोधिक ट्विट करत उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. आज पाच राज्यांचे निवडणूक निकाल समोर आले. यामध्ये पाच पैकी तीन राज्यांमध्ये काँग्रेसने भाजपाचा धुव्वा उडवला. अशात आता मोदी सरकावर चौफेर टीका होताना दिसते आहे. अबकी बार, खो दी सरकार — Akhilesh Yadav (@yadavakhilesh) December 11, 2018 पाच राज्यांचा जो काही निकाल लागला त्यात एकाही ठिकाणी भाजपाला यश मिळवता आलेले नाही. याच अनुषंगाने विरोधक मोदींवर तुटून पडले आहेत. अबकी बार, खो दी सरकार असा ट्विट करत अखिलेश यादव यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. अबकी बार, मोदी सरकार असे घोषवाक्य २०१४ च्या निवडणुकांच्या वेळी भाजपाने पुढे आणले होते आणि प्रचलितही केले होते. त्याच घोषणेत अखिलेश यादव यांनी थोडा बदल करून टीका केली आहे. Akhilesh Yadav