एका भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने प्रवाशी घेऊन जात असलेल्या एका रिक्षाला जोरदर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात रिक्षातील सर्व पाच जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातच्या खेडा जिल्ह्यात शुक्रवारी हा प्रकार घडला.


पोलिसांच्या माहितीनुसार, गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील महुधा-कथलाल मार्गावर शुक्रवारी सकाळी हा अपघात घडला. या मार्गावर एक ट्रक भरधाव वेगाने निघाला होता. दरम्यान, चार प्रवाशी आणि वाहकासह पाच जण एका रिक्षातून त्याच मार्गावरुन निघाले होते. उलट्या दिशेने येणाऱ्या ट्रकने या रिक्षाला जोरदार टक्कर दिली. ही टक्कर इतकी जबरदस्त होती की, या अपघातात रिक्षाचा अक्षरशःचक्का चूर झाला असून यातील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर चालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे.

फारुख चौहान (रिक्षा चालक), नजीर चौहान, इरशाद चौहान, सलीम भथियारा आणि यासीन भथियारा अशी रिक्षातील मृत व्यक्तींची नावे आहेत. हे सर्वजण खेडा जिल्ह्यातल्या महुधा वस्तीजवळच्या एका गावचे रहिवासी होते. ट्रक चालकाने माहामार्गावरील इतर वाहनांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात रिक्षाला जोरदार धडक दिली.