औरंगाबाद जिल्ह्य़ात तितई बिघाजवळ गुरुवारी पहाटे वेगाने जाणारा एक ट्रक उलटून रस्त्यालगतच्या खड्डय़ात पडल्याने झालेल्या अपघातात ११ मुलांसह २५ जण ठार झाले. या अपघातात अन्य १० जण जखमी झाल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
जिल्ह्य़ाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण कुमार घटनास्थळाहून पीटीआयशी बोलताना म्हणाले की, या ट्रकचा चालक दारूच्या नशेत होता व अपघातानंतर त्याच्या सहकाऱ्यासह तो पळून गेला. अपघातात जखमी झालेल्या एका इसमाने ही माहिती आपणास दिली.
या ट्रकमधून एकूण ३५ जण प्रवास करीत होते.