गाधी आणि नेहरू कुटुंबच काँग्रेसची ब्रान्ड इक्विटी आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त बाहेरील अन्य व्यक्ती काँग्रेस पक्ष चालवू शकत नाहीत, असं वक्तव्य काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी केलं. ज्या स्थानिक पक्षांची कोणतीही विचारधारा नाही, असे पक्ष कमकुवत झाले तरच काँग्रेसचं पुनरागमन शक्य असल्याचे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अधीर रंजन चौधरी हे काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे सदस्य आहेत. पक्षाचा अध्यक्ष निवडण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी याच कमिटीवर असते. नुकतीच सोनिया गांधी यांची काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी निवड झाली. यावरही त्यांनी भाष्य केलं. “गाधी कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तीसाठी काँग्रेस पक्ष चालवणं कठिण आहे. राजकारणात ब्रान्ड इक्विटीदेखील असते,” असे चौधरी यावेळी म्हणाले. “जर भाजपाकडे पाहिले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याशिवाय पक्ष योग्यरित्या काम करू शकेल का?” असा सवालही त्यांनी केला. “त्याच्याप्रमाणेच काँग्रेसमध्ये गांधी कुटुंब हे ब्रान्ड इक्विटी आहे. यात काही अयोग्य नाही. त्यांच्याकडे असलेली प्रतिभा अन्य कोणत्याही व्यक्तीकडे नाही आणि हे एक कटू सत्य आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adhir ranjan chowdhury comments nehru gandhi family brand equity of congress jud
First published on: 17-08-2019 at 15:49 IST