२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन हॅक करण्यात आल्या होत्या हा भारतीय सायबर तज्ञ सय्यद शुजा याने केलेला दावा निवडणूक आयोगाने फेटाळून लावला आहे. सय्यज शुजा यांने लंडनमध्ये पत्रकार परिषदेत हा दावा केल्यानंतर काही तासांच्या आत निवडणूक आयोगाने त्याचा दावा फेटाळून लावला. Election Commission: It has come to our notice that an event claiming to demonstrate EVMs used by ECI can be tampered with,has been organised in London. ECI has been wary of becoming a party to this motivated slugfest & stands by empirical facts about foolproof nature of ECI EVMs pic.twitter.com/bACXaDfzqN— ANI (@ANI) January 21, 2019 भारतातील ईव्हीएम मशीन पूर्णपणे सुरक्षित आहेत असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. सय्यद शुजा यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचाही विचार करत आहोत असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. भारतातील निवडणूकांमध्ये ज्या ईव्हीएम मशीन वापरल्या जातात त्या भारत इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या कठोर निरीक्षणाखाली आणि सुरक्षेमध्ये तयार केल्या जातात असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. EC: These EVMs are manufactured in Bharat Electronics Ltd. & Electronics Corporation of India Ltd. under very strict supervisory&security conditions.There are rigorous Standard Operating Procedures observed under supervision of a Committee of technical experts constituted in 2010 https://t.co/NAgRYcAqIB— ANI (@ANI) January 21, 2019 सय्यद शुजाने लाइव्ह प्रेस कॉन्फरन्स घेत अनेक खळबळजनक दावे केले आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुका या आधीच फिक्स केल्या होत्या असा आरोप त्यानं केला आहे. गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू नवी दिल्लीमध्ये कार अपघातात झाला होता. परंतु शुजा या सायबर एक्सपर्टच्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. आपल्याकडे हॅकिंग कसं झालं याचे पुरावे असून ते आपण सादर करू शकतो असा दावाही त्यानं केला आहे. शुजा इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरशन ऑफ इंडिया लि.चा २००९ ते २०१४ या कालावधीत कर्मचारी होता असं त्यानं म्हटलं आहे. त्यानं सांगितलं की निवडणूक आयोग तसेच राजकीय पक्षांनाही बोलावण्यात आलं होतं, परंतु कपिल सिब्बलवगळता अन्य कुणी गेलेलं नाही. शुजावर चार दिवसांपूर्वी हल्ला झाला होता, त्यामुळे तो गुप्त ठिकाणावरून व्हिडीयो कॉन्फरन्सच्या माध्यमातून संपर्कात आहे. याआधीही सय्यद शुजा व त्याच्या सहकाऱ्यांवर हल्ले झाले होते असंही त्यानं म्हटलं आहे. दिल्लीमधल्या २०१५ मधल्या निवडणुकांतही घोळ होणार होता, परंतु आम्ही वेळीच दुर्घटना रोखली आणि आपनं ७० पैकी ६७ जागा जिंकल्या अन्यथा भाजपानं निवडणुका जिंकल्या असत्या असं शुजानं म्हटलं आहे.