वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. विरोधकांची युती होऊ नये म्हणून भाजपाकडून ब्लॅकमेलिंग होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नातेवाईकांना खूश करणे, सत्तेत बसण्यासाठीची भाजपाकडून राजकारण सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले. तसेच लोकसभा निवडणुकीनंतर भारिप बहुजन महासंघ वंचित आघाडीत विलीन करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  यावेळी त्यांनी भाजपावर टीका केली. नागपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून देण्यात आलेली नाना पटोले यांची उमेदवारी डमी असल्याचा आरोप त्यांनी केला.

Vijay Wadettiwar criticize dr Prakash Ambedkar in nagpur
“हुंडा न मिळाल्याने लग्न तुटले असावे,” विजय वडेट्टीवार यांची प्रकाश आंबेडकर यांच्यावर खोचक टीका; म्हणाले…
prakash ambedkar said in akola that Disputes Emerge Within maha vikas aghadi Congress Lacks Leadership
“नेतृत्वहीन असल्याने काँग्रेसमध्ये निर्णय क्षमता नाही,” ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा डागली तोफ; म्हणाले, “काँग्रेस नेत्यांचे विरोधकांशी…”
lok sabha elections 2024 vanchit bahujan aghadi chief prakash ambedkar exit from alliance with maha vikas aghadi
नागपूर, कोल्हापूरसाठी काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या प्रकाश आंबेडकरांविरोधातच अकोल्यात उमेदवार
sanjay raut prakash ambedkar tweet
“वंचितच्या पाठित खंजीर खुपसलात’, प्रकाश आंबेडकरांचा संजय राऊतांना टोला; मविआतल्या अंतर्गत बाबी जाहीर करत म्हणाले…

त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीनंतर भारिप बहुजन महासंघ वंचित आघाडीत विलीन करणार असून यापुढील सर्व निवडणुका या वंचित आघाडीच्या झेंड्याखाली लढणार असल्याचे ते म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या या निर्णयाचे महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होतील, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी जाहीर केली असून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आता आघाडी अशक्य असल्याचे दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले होते. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील त्यांची उमेदवारी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या अडचणीची ठरण्याची शक्यता आहे.