तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीसाठी अन्य राजकीय पक्षांबरोबर आघाडी करण्यावरून गुरुवारी सत्तारूढ अभाअद्रमुक आणि विरोधी द्रमुकने एकमेकांवर सभागृहातच जोरदार टीका केली.

द्रमुक अन्य पक्षांकडे आघाडी करण्याची याचना करीत आहे, तर मुख्यमंत्री जयललिता यांना जनतेचा पाठिंबा मिळत आहे, असे गृहनिर्माणमंत्री आर. वैथलिंगम म्हणाले.

तर फॉरवर्ड ब्लॉकसारख्या पक्षांसमवेत सत्तारूढ पक्षाची आघाडी आहे. त्यामुळे सत्तारूढ पक्ष निवडणुकीत अशा छोटय़ा राजकीय पक्षांच्या पाठिंब्याविना उतरणार का, असा सवाल दुराईमुरूगन यांनी केला.राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेतद्रमुकचे आमदार जे. अंबाझगन यांनी चेंबरमबक्कम जलाशयातील पाणी पुराच्या वेळी योग्य वेळी सोडण्यात आले नसल्याचा आरोप केला.