‘वंदे मातरम्’च्या सक्तीवरून ‘एमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. वंदे मातरम् गायलाच हवं अशी सक्ती करून भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारला देशात हिंदुत्ववाद पसरवायचा आहे आणि देशातून धर्मनिरपेक्षता नष्ट करायची आहे, असा आरोप त्यांनी केला. वंदे मातरम् हे राष्ट्रीय गीत गाण्याची सक्ती करणं असंवैधानिक असल्याचंही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वंदे मातरम् बंधनकारक करणं चुकीचं असून असंवैधानिक आहे. वंदे मातरम् हे राष्ट्रीय गीत आहेच, पण ते गाण्याची सक्ती करणं गैर आहे, असं ओवैसी म्हणाले. राष्ट्रीय गीत सर्वांनीच गायलं पाहिजे, अशी सक्ती करून देशात हिंदुत्ववादाचा प्रसार केला जात आहे; तसंच धर्मनिरपेक्षता हद्दपार करण्याचं काम केंद्र सरकारकडून केलं जात आहे, असा आरोपही त्यांनी केल्याचं वृत्त ‘एएनआय’नं दिलं आहे. अशा प्रकारची सक्ती करून भाजपला देशात एकतर हिंदुत्वाचा प्रसार करायचा आहे. तसंच ‘घटनात्मक राष्ट्रवादा’चा प्रसार करायचा आहे, अशी टीकाही त्यांनी केली. आम्ही मुस्लिम अल्लाला मानतो, पण म्हणून आमचं देशावर प्रेम नाही असा त्याचा अर्थ होत नाही. देशासाठी मुस्लिमांनी अनेक त्याग केले आहेत. इतिहास त्याचा साक्षीदार आहे. तसंच देशासाठी आमची त्याग करण्याची तयारीही आहे. घटनेनं आम्हाला धर्मिक स्वातंत्र्य दिलं आहे. मग आम्ही हिंदुत्वाचा प्रसार का करायचा, असा सवालही त्यांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aimim chief asaduddin owaisi says bjp spreading hindutva destroying secularism by making vande mataram compulsory
First published on: 11-08-2017 at 15:33 IST