अमूल कंपनीतर्फे अटल बिहारी वाजपेयी यांना अनोखी आदरांजली वाहण्यात आली आहे. हर बॅटलमें अटल अशी पंच लाईन वापरत अमूलने अटलजींबाबतचा आदर व्यक्त केला आहे. अमूल कंपनीतर्फे अशा काही प्रसंगांच्या वेळी कायमच पुढाकार घेऊन आणि प्रतिभाशक्तीचा वापर करून आदर व्यक्त करण्यात येतो. ती परंपरा अमूलने याही वेळी पाळली आहे.

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरूवारी एम्स रूग्णालयात निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर आज दिल्ली येथील स्मृती स्थळ या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी संध्याकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

अटलजींना अखेरचा निरोप देताना सगळा देश हळहळला. देशाला नवी दिशा देणारा बाप माणूस हरवल्याची भावना प्रत्येकाच्याच मनात होती. अंत्यसंस्कारांच्या आधी त्यांचे पार्थिव स्मृती स्थळ या ठिकाणी आणण्यात आले. त्यावेळी त्यांच्या पार्थिवाला लष्कराच्या तिन्ही दलांकडून सलामी देण्यात आली. तसेच  राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांनी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले आणि त्यावर पुष्पचक्र अर्पण केले.