धर्मातरविरोधी कायदा आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये सहमती हवी, अशी अपेक्षा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली.
शिवगिरी मठ येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी धर्मातरावर बंदी आणण्यासाठी सरकार कायदा आणण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले. प्रत्येकाने जर आपला धर्म पाळला तर धर्मातरावरून वाद होणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.