पश्चिम बंगालमधील भाटपारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कांकिनारा भागातून जवळपास ५० बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. मात्र सध्या येथीप परिस्थिती साधारण असल्याची माहिती उत्तर २४ परगनात बराकपूर विभाग-१ चे पोलिस आयुक्त अजय ठाकुर यांनी दिली.

लोकसभा निवडणुकांच्या अगोदरपासूनच भाटपारा परिसर कायम अशांत राहिलेला आहे. रविवारीच या ठिकाणी तणावग्रस्त वातावरणाच्या पार्श्वभूमीवर कलम १४४ लागू करण्यात आहे होते. पोलिसांकडू येथील परिस्थिती कायम शांत ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर सद्य स्थितीबाबत बोलताना येथील भाजपा खासदार अर्जुन सिंह यांनी सांगितले होते की, राज्य आता लढाईच्या मानसिकतेत आहे. राज्यातून लवकरच ममतांना निरोप दिला जाईल.