जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर आता या ठिकाणी विविध मह्त्वपूर्ण घडामोडीत आहेत. जवळपास ७० दहशतवादी आणि पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या फुटीरतावादी कैद्यांना काश्मीर खोऱ्यातून भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने आग्रा येथे हलवण्यात आले आहे. Srinagar- Around 70 terrorists and hardcore pro-Pakistan separatists from Kashmir valley have been shifted to Agra. The terrorists and separatists were shifted in a special plane provided by the Indian Air Force: Sources pic.twitter.com/6DsDYNrddh — ANI (@ANI) August 8, 2019 याशिवाय विभाग तसेच जिल्हास्तरावर काम करणाऱ्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना कामावर पुन्हा रूजू होण्याचे सरकारच्या मुख्य सचिवांनी गुरूवारी निर्देश दिले आहेत. तसेच, सर्व कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी सुलभ व सुरक्षित वातावरण मिळावे ही जिल्हा प्रशासनाची जबाबदारी असणार आहे. J&K Government: It is further intimated that necessary arrangements regarding smooth and secure working environment for the employees have been made by the administration. — ANI (@ANI) August 8, 2019 सांबा जिल्हा प्रशासनाने गुरूवारी दिलेल्या आदेशानुसार सर्व सरकारी व खासगी शाळांसह सर्व शैक्षिणक संस्था ९ ऑगस्टपासून सुरू केल्या जाणार आहेत.