आसामनंतर अरूणाचल प्रदेशाला निसर्गाचा तडाखा बसला आहे. अरूणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यात भूस्खलन झाल्यामुळे अनेक लोक अडकले आहेत. बचावाचे कार्य सुरू असून भारतीय लष्कराचे जवान तिथे मदतीसाठी पोहोचले आहेत. आतापर्यंत जवानांनी ५० मुलांसह २०० लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले आहे.