स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापू याच्याविरोधातील बलात्कार प्रकरणात बुधवारी जोधपूरमधील न्यायालयाने निकाल दिला. न्यायालयाने आसाराम बापूसह शरद व शिल्पी या दोन आरोपींना दोषी ठरवले असून आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आसारामवर होता, ज्याची सुनावणी जोधपूरमधल्या विशेष एससी-एसटी न्यायालयात झाली. वय 77 वर्षे असलेल्या आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावणाऱ्या न्यायालयाने शरद व शिल्पी या सहआरोपींनाही प्रत्येकी 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा ऐकल्यानंतर आपले उर्वरीत आयुष्य तुरुंगातच जाणार याची कल्पना आलेला आसाराम कोर्टात ढसाढसा रडला.

मूळची उत्तर प्रदेशच्या शहाजहाँपूर येथील आणि आसाराम याच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील आश्रमात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून आसारामला अटक करण्यात आली होती. आसारामने जोधपूरनजीकच्या मनाई भागातील आश्रमात बोलावून १५ ऑगस्ट २०१३ च्या रात्री आपल्यावर बलात्कार केल्याचा तिचा आरोप होता. आसारामला इंदूरहून अटक करून १ सप्टेंबर २०१३ रोजी जोधपूरला आणण्यात आले होते. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांनी आसाराम व ४ सहआरोपींवर ६ नोव्हेंबर २०१३ रोजी आरोपपत्र दाखल केले होते. संचिता गुप्ता उर्फ शिल्पी ही या दुर्दैवी मुलीच्या हॉस्टेलची वॉर्डन होती तर छिंदवाडातील या आश्रमशाळेचा संचालक होता. शिल्पी व शरदचंद्र यांनी आसारामला या कृष्णकृत्यामध्ये साथ दिल्याचे न्यायालयात सिद्ध झाले व त्यांनाही 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.

Narayan Rane case, Vinayak Raut, Parab,
२००५ नारायण राणेंच्या सभेतील गोंधळाचे प्रकरण : विनायक राऊत, परब, सावंत, देसाई, रवींद्र वायकर यांची निर्दोष सुटका
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
maval marathi news, sexually assaulted and killed 6 year old girl
मावळात बालिकेवर अत्याचार करुन खून करणाऱ्या आरोपीला फाशी, आरोपीच्या आईला सात वर्ष सक्तमजुरी
Patanjali Expresses Regret
बाबा रामदेव यांना धक्का; सर्वोच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर ‘पतंजली’ची बिनशर्त माफी

या खटल्याची सुनावणी १९ मार्च २०१७ रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू झाली आणि १६ डिसेंबर २०१७ रोजी ती एस.सी.-एस.टी. प्रकरणांच्या विशेष न्यायालयाकडे वर्ग करण्यात आली होती. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदाविषयक प्रकरणांच्या विशेष न्यायालयात या खटल्यातील अंतिम युक्तिवाद ७ एप्रिलला पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल २५ एप्रिलला जाहीर करण्यासाठी राखून ठेवला होता.

बुधवारी न्यायालयाने या प्रकरणात निकाल दिला. आसारामबापूसह शिल्पी, शिवा, प्रकाश आणि शरदचंद्र या सर्वांना न्यायालयाने दोषी ठरवले. आम्ही आमच्या वकिलांशी या निकालाबाबत चर्चा करू आणि पुढे काय करायचं ते ठरवू असं आसारामच्या प्रवक्त्या निलम दुबे यांनी सांगितलं आहे. तर आसारामला शिक्षा झाल्यामुळे आपल्याला न्याय मिळाला असल्याची भावना त्या मुलीच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. आसारामवर अन्य प्रकरणांतही गुन्हे दाखल असून त्या पीडितांनाही न्याय मिळेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

जोधपूर न्यायालयाने आसाराम, शरदचंद्र व शिल्पी यांना दोषी ठरवलं व शिक्षा सुनावली तर शिवा व प्रकाश या दोघांना निर्दोष असल्याचा निर्वाळा देत त्यांची मुक्तता केली आहे.