मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकारविरुद्ध जनक्षोभ उसळला असल्याची आपल्याला जाणीव झाली आहे. त्यांच्या सरकारची मृत्युघंटा वाजली आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी येथे सांगितले.

‘शोनार बांगला’चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यात भाजपला सरकार स्थापनेची संधी द्या, अशी विनंतीही शहा यांनी जनतेला केली आहे. बुधवारी रात्रीपासून आपण पश्चिम बंगालमध्ये आहोत आणि सरकारविरुद्ध जनक्षोभ असल्याची जाणीव आपल्याला झाली आहे, इतकेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच बदल घडू शकतो याची जाणीव जनतेला झाली असल्याचेही दिसून येत आहे, असेही गृहमंत्री म्हणाले.