पश्चिम बंगालमधील अलीद्वारपूर येथे भारतीय हवाई दलाचे मिग-२७ हे लढाऊ विमान शुक्रवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास कोसळले. या अपघातात दोन नागरिक ठार झाले असून वैमानिक बचावला आहे. मिगने हाशिमारा विमानतळावरून नेहमीप्रमाणे उड्डाण केले होते. वैमानिकाने विमान कोसळत असल्याचे समजताच बाहेर उडी घेतल्याने तो बचावला. अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले.