देशभर चर्चेत राहिलेल्या पश्चिम बंगालमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालात तृणमूल काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. निकाल जाहीर झालेल्या १७ पैकी ११ जिल्ह्य़ांमध्ये तृणमूल काँग्रेसने मुसंडी मारली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची होती.  यापूर्वी माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या बांकुरा, पुरुलीया, पूर्व आणि पश्चिम मिदनापूर जिल्ह्य़ात तृणमूल काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. माकपचा बालेकिल्ला असलेल्या हुगली आणि बर्दमान या जिल्ह्य़ांमध्येही तृणमूल काँग्रेसने मुसंडी मारली आहे. डाव्या आघाडीला उत्तर दिनाजपूर, माल्डा आणि मुर्शिदाबाद जिल्ह्य़ांमध्ये आघाडी मिळाली आहे.