हौतात्म्य पत्करलेल्या भारतीय जवानांबाबत बिहारचे मंत्री भीमसिंग यांनी वादग्रस्त विधान करून काही दिवस होत नाहीत तोच, नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळातील कृषिमंत्र्यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. पाकिस्तान हा आपला शेजारीच नव्हे तर लहान भाऊ आहे. पाच भारतीय जवानांच्या हत्येमागे पाकिस्तानचा हात असेल असे वाटत नाही, असे सांगत पाकिस्तानला निर्दोष ठरविण्याचा प्रयत्न बिहारचे कृषिमंत्री नरेंद्र सिंग यांनी केला आहे.