बिहारमध्ये बोट उलटल्याने झालेल्या अपघातात १९ जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास ४० जणांना घेऊन जाणारी बोट गंगा नदीत उलटल्याने हा अपघात झाला. बिहारची राजधानी पाटण्यामध्ये हा अपघात झाला.
प्रवासी बोट नदीत उलटल्यानंतर आठ जणांना वाचवण्यात आल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्याला वेग आला असून बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू आहे. बचाव करण्यात आलेल्या प्रवाशांवर पाटणाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Patna boat capsize incident: Death toll rises to 19, Rs 4 lakh compensation each to be given to the kin of the deceased persons. pic.twitter.com/aWbQaEnojA
— ANI (@ANI_news) January 14, 2017
A boat carrying 40 people capsizes in river Ganga in Patna (Bihar). Rescue operations underway. pic.twitter.com/HfyKQ6jiUm
— ANI (@ANI_news) January 14, 2017
प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने हा अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. पतंग महोत्सवावरुन माघारी परतणारे प्रवासी या बोटीत होते. बोट उलटल्यानंतर नदीत बुडणाऱ्या आठ पैकी सहा प्रवाशांना वाचवण्यात एनडीआरएफच्या पथकाला यश आले. दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 14, 2017 9:49 pm