नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि यापुढेही राहिल, भाजपाच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलेल्या या वक्तव्याशी भाजपा सहमत नाही. आम्ही याची निंदा करतो. पक्ष साध्वीला याचे स्पष्टीकरण मागेल, तिला देखील या वक्तव्याबद्दल सार्वजनिकरित्या माफी मागावी लागेल. असे भाजपा प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहाराव यांनी म्हटले आहे.
GVL Narasimha Rao, BJP on Pragya Singh Thakur's statement "Nathuram Godse was, is & will remain a 'deshbhakt": BJP does not agree with this statement, we condemn it. Party will ask her for clarification, she should apologise publicly for this statement. pic.twitter.com/yBEs8nQoWW
— ANI (@ANI) May 16, 2019
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने नथुराम बद्दल केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय पक्षांकडून भाजपावर टीका होऊ लागल्यानंतर भाजपा प्रवक्ते नरसिंहाराव यांनी असे सांगितले आहे.
भोपाळमधून साध्वी प्रज्ञा या निवडणूक लढवत आहेत. शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर वाद निर्माण झाला होता. तो वाद शमत असतानाच साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी पुन्हा नथुराम गोडसेला देशभक्त म्हणून नव्या वादाला सुरूवात करून दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 16, 2019 4:29 pm