पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला  दोनशेहून अधिक जागा मिळतील, असा विश्वास भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त के ला आहे.

ते त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधत होते. शनिवारी  पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये पहिल्या टप्प्यात मतदान शांततेत पार पडले. त्यानंतर कार्यकत्र्यांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बंगालमध्ये भाजपची भगवी लाट आल्याचे संके त मिळाले. पहिल्या टप्प्यात तेथे ३६  जागांवर मतदान झाले. त्यापैकी २६ जागा भाजपला मिळेल आणि इतर टप्प्यात २९४ सदस्यीय पश्चिम बंगालमध्ये भाजपला २०० हून अधिक जागा मिळतील, असे ते म्हणाले.