जम्मू काश्मीरमधील बांदीपोरा येथे दहशतवाद्यांनी भाजप नेते शेख वसीम, त्यांचे वडील आणि त्यांचा भाऊ यांना गोळ्या घालून हत्या केल्याची घटना घडली. बांदीपोरा येथे दहशतवाद्यांनी भाजपा कार्यकर्ता वसीम बारी यांच्यावर गोळीबार केला. अंदाधुंद केलेल्या गोळीबारात वसीम बारी, त्यांचे वडील बशीर अहमद आणि त्याचा भाऊ उमर बशीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु त्या ठिकाणी तिघांचाही मृत्यू झाल्याची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली. शेख वसीम हे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष होते आणि आपल्या कुटुंबीयांसोबत एका दुकानाजवळ बसले होते. त्याचवेळी अचानक आलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. ही घटना ज्यावेळी घडली त्यावेळी त्यांच्यानजीक कोणीही नव्हतं. तसंच सुरक्षा रक्षकही उपस्थित नव्हता. वसीम यांना सुरक्षा पुरवण्यात आली होती. परंतु घटनेदरम्यान त्या ठिकाणी कोणीही उपस्थित नव्हतं. दरम्यान, जम्मू काश्मीर पोलिसांनी खासगी सुरक्षा अधिकाऱ्यांना आपलं कर्तव्य योग्यरित्या न बजावल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात येणार असल्याची माहिती दिली. #Terrorists fired upon BJP worker Wasim Bari at #Bandipora. During indiscrimnate firing Wasim Bari, his father Bashir Ahmad and his brother Umer Bashir got injured and shifted to hospital but unfortunately all the three #succumbed to their injuries. @JmuKmrPolice — Kashmir Zone Police (@KashmirPolice) July 8, 2020 #UPDATE - Former Bandipora BJP president Wasim Bari, his father & brother, all 3 succumbed to their injuries. The family had a component of 8 security people but unfortunately, none of them was kept along at the time of incident: J&K DGP Dilbag Singh (file pic) pic.twitter.com/yZm2jTRoCd — ANI (@ANI) July 8, 2020 "वसीम यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आठ सदस्यीय सुरक्षा टीम पुरवण्यात आली होती. परंतु घटनेदरम्यान त्यांच्यापैकी कोणीही उपस्थित नव्हतं," अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं जम्मू काश्मीरचे पोलीस डीजीपी दिलबाग सिंग यांच्या हवाल्यानं दिली. या घटनेनंतर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीदेखील शोक व्यक्त केला. तसंच भाजपाचे ज्येष्ठ नेते राम माधव यांनीदेखील या घटनेचा निषेध केला. "बांदीपोरामध्ये भाजपा नेते वसीम बारी आणि त्यांच्या भावाच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हत्येमुळे आम्हाला दु:ख झालं आहे. ८ सुरक्षा रक्षक असतानाही अशी घटना घडली. त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करतो," असं राम माधव म्हणाले.