राज्यभर महाराष्ट्र दिन साजरा होत असताना नक्षलवाद्यांनी गडचिरोलीतील कुरखेडाजवळ बुधवारी भूसुरुंग स्फोट घडवला. त्यात शीघ्रकृती पथकाचे (क्यूआरटी) १५ जवान शहीद झाले. जवानांना घेऊन जाणाऱ्या खासगी गाडीचा चालकही या हल्ल्यात मृत्युमुखी पडला. या हल्ल्यानंतर आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सुरु झाले आहे. मात्र या नक्षली हल्ल्यावरुन राजकारण करताना भाजपाच्या एका नेत्याने गडचिरोली छत्तीसगडमध्ये असून काँग्रेसची सत्ता असणाऱ्या राज्यात हा हल्ला झाल्याचा जावई शोध लावला आहे. कर्नाटकमधील चिकमंगळूर येथील भाजपाचे आमदार सी. टी. रवी यांनी ट्विट करुन गडचिरोलीतील हल्ल्यासाठी काँग्रेसला जबाबदार धरत गडचिरोली छत्तीसगडमध्ये असल्याचे म्हटले आहे. रवी यांनी केलेल्या ट्विटमध्ये, 'गडचिरोलीमध्ये झालेल्या भ्याड नक्षली हल्ल्यात आपले शूर जवान शहिद झाले. शहीद जवानांसाठी मी प्रार्थना करतो. छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्तेत आल्यापासून देशद्रोह्यांना नवसंजीवनी मिळाली आहे. त्यांना शोधून कठोर शिक्षा द्यायला हवी' असे म्हटले आहे. Naxal attack in Gadchiroli that martyred our Brave Soldiers is a cowardly act executed by Barbarians. I pray for Our Martyrs. The return of CONgress in Chattisgarh has given a new life to the Anti-Nationals. They should be mercilessly hunted down & given the harshest punishment. — Chowkidar C T Ravi ಸಿ ಟಿ ರವಿ (@CTRavi_BJP) May 1, 2019 रवी यांच्या या ट्विटनंतर अनेकांनी त्यांना गडचिरोली छत्तीसगडमध्ये नसून महाराष्ट्रात असल्याचे सांगितले आहे. नक्षली हल्ल्याचे राजकारण करताना कमीत कमी हल्ला झालेले ठिकाण कुठे आहे याची तरी माहिती करुन घ्या असंही नेटकऱ्यांनी रवी यांना सुनावले आहे. लाज वाटू द्या Sir ji, #Gadchiroli is in Maharashtra and not Chhattisgarh. Have some shame. You are politicising their death but have no clue what you are talking about. — Vivek Mishra (@VVK29) May 1, 2019 काही बोलूच नका Stop describing yourself @CTRavi_BJP! Everyone knows that you are a retard, first you said #gadchiroli is in Chhattisgarh, now you are using your shakha logic to twist history. — Varun Hari Prasad || ವರುಣ್ ಹರಿ ಪ್ರಸಾದ್ (@VarunHariPrasad) May 2, 2019 चौकीदार तुम्हाला हे ठाऊक आहे का? Chowkidar ji. You are aware that #Gadchiroli is in Maharashtra - a BJP ruled state and not in Chhattisgarh, right? — Κρόνος (@libertariandesi) May 2, 2019 आयटी सेलमधील लोक #Gadchiroli is in Maharashtra not in Chhattisgarh. These idiots of IT Cell. — Nomad (@modern_gandhi18) May 2, 2019 मोदींच्या परदेश दौऱ्याचा परिणाम काँग्रेसचे नेते संजय झा यांनीही ट्विट करुन भाजपाला गडचिरोली छत्तीसगडमध्ये नाही तर महाराष्ट्रात आहे हे ही ठाऊक नाही हा मोदींच्या परदेश दौऱ्याचा परिणाम आहे असे खोचक ट्विट केले आहे. So the #BJP does not know that #Gadchiroli is in Maharashtra not Chhattisgarh. This is the effect of #Modi ‘s foreign trips. — Sanjay Jha (@JhaSanjay) May 3, 2019 मात्र इतकी टिका झाल्यानंतरही रवी यांनी आपले ट्विट डिलीट केले नसून त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. आपल्या स्पष्टीकरणाच्या ट्विटमध्ये ते म्हणतात, 'काँग्रेस समर्थकांना हे ठाऊक नाहीय की नक्षलवाद्यांना छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सरकार आल्यानंतर नवसंजीवनी मिळाली आहे. काँग्रेस समर्थकांनी इतिहास वाचायला हवा. २००४ मध्ये आंध्रप्रदेशमध्ये काँग्रेस सत्त्तेत आल्यानंतर नक्षलवाद कशाप्रकारे वाढला हे त्यांनी जाणून घ्यायला हवं.' Mentally retarded CONgis and stupid liberals don't realize that Naxals got a new lease of life under the Chattisgarh CONgress Government. They should read history to understand how Naxalism spread in many States after CONgress came back to power in Andhra Pradesh in 2004. — Chowkidar C T Ravi ಸಿ ಟಿ ರವಿ (@CTRavi_BJP) May 1, 2019 दरम्यान लोकसभा निवडणुकीत गडचिरोलीत भरघोस मतदान झाले होते. यामुळे नक्षलवाद्यांनी २२ ते २८ एप्रिलदरम्यान बंदचे आवाहन केले होते. मात्र, त्यास स्थानिकांकडून प्रतिसाद न मिळाल्याने नक्षलवादी बिथरले होते. त्यामुळे आपले वर्चस्व दाखवून देण्याबरोबरच गेल्या वर्षी कसनासूर-बोरीयाच्या जंगलात पोलिसांनी ४० नक्षलवाद्यांना ठार केल्याचा बदला घेण्यासाठी नक्षलवाद्यांनी हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे.